हैदराबादची सरशी

  144

दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन यांची वादळी खेळी सनरायजर्स हैदराबादच्या विजयात शनिवारी महत्त्वाची ठरली. मयांक मार्कंडेने प्रभावी गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला विजयापासून ९ धावांनी दूर ठेवले.



प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने शतकी भागिदारी साजरी केली. ही जोडी सेट झाल्याने दिल्लीच्या विजयाच्या आशा अधिक होत्या. परंतु ५९ धावा करणारा फिल रॉल्ट बाद झाल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजीला गळती लागली. पुढच्याच षटकात नवखा फलंदाज मनीष पांडे स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर ६३ धावा करणाऱ्या मार्शचाही संयम सुटला. तळात अक्षर पटेलने २९ धावांची फटकेबाजी केल्याने दिल्लीला निर्धारित षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १८८ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादच्या मयांक मार्कंडेने ४ षटकांत २० धावा देत २ बळी मिळवले.



अभिषेक शर्मा याचे वादळ आणि क्लासेनच्या झंझावाताच्या बळावर सनरायजर्स हैदाराबादने निर्धारित २० षटकांत सहा विकेटच्या मोबदल्यात १९७ धावांपर्यंत मजल मारली. अभिषेकने ३६ चेंडूंत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर क्लासेनने फलंदाजीची सूत्रे हातात घेतली. त्याने अब्दुल समदसोबत ३३ चेंडूंत ५३ धावांची भागिदारी केली. अब्दुल समद बाद झाल्यानंतर अकिल हुसेनच्या साथीने हैदराबादच्या डावाला फिनिशिंग टच दिला. क्लासेनने २७ चेंडूंत नाबाद ५३ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. अब्दुल समदने २१ चेंडूंत २८ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. अकिल हुसेनने १० चेंडूंत नाबाद १६ धावांची खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्शने भेदक मारा केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मिचेल मार्शने चार षटकांत २७ धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. मिचेल मार्शने एक निर्धाव षटक टाकले. अक्षर पटेलने ४ षटकांत २९ धावा देत एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण