जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतली ५०० कोटींची सुपारी!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप


मुंबई : जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी ५०० कोटींची सुपारी घेतली. त्यापैकी ठाकरेंनी ५ कोटी रुपये आगाऊ घेतले आणि ५०० कोटी रुपये नंतर देण्याचे ठरले होते, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे बारसूमध्ये आल्यास त्यांना पळता भुई थोडी होईल, असे थेट आव्हान राणे यांनी दिल्याने ठाकरे गोटात खळबळ उडाली आहे.


आज पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते व केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंनीच खोके घेतले. त्यामुळे दुसऱ्यांवर खोके म्हणून टीका करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही, असे खडेबोल राणेंनी यावेळी सुनावले.


राज्यात जेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत चाचपणी सुरु होती तेव्हा कोळशावर वीजनिर्मिती करणारे ३४ उद्योजक उद्धव ठाकरेंना भेटले होते. जैतापूरचा प्रकल्प होऊ नये, यासाठी या उद्योजकांनी उद्धव ठाकरेंसोबत ५०० कोटींचा व्यवहार केला होता. त्यावेळी ठाकरेंनी ५ कोटी रुपये आगाऊ घेतले आणि ५०० कोटी रुपये नंतर देण्याचे ठरले होते, असा खूलासा केला.


पुढे बोलताना राणे म्हणाले की, जैतापूर ऐवजी बारसूला रिफायनरी व्हावी म्हणून ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणाला विचारुन पत्र दिले? बारसू येथील उर्जा प्रकल्पाला आता ठाकरे गटाने विरोध केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बारसूमध्ये येऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहेत असे समजते. तर मग आम्ही कोकणातच आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावे, असे आव्हान देखील नारायण राणे यांनी दिले आहे. सोबतच आपल्याला पळता येईल का याचाही विचार करावा कारण मुंबईपर्यंत त्यांना पळत जावे लागेल. ज्यांना चालताही येत नाही, त्यांनी पळण्याचा विचारही करू नये, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार