जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभावी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.


जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी तब्बल दहा वर्षांनंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (२८ एप्रिल) निकाल दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी गुरुवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकला आणि या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणात जिया खानचा प्रियकर असलेला चित्रपट अभिनेता सूरज पांचोली याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता.


आज अखेर या प्रकरणावर निकालाची सुनावणी झाली. जिया खान मृत्यू प्रकरणात आरोपी असलेला सूरज पांचोली त्याच्या आईसोबत कोर्टात पोहोचला होता. सूरज पांचोली याची आई अभिनेत्री झरिना वहाब या वेळी सतत आपल्या मुलाला आधार देताना दिसली.


३ जून २०१३ रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.जिया खानच्या घरातून सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये जियाने सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते.


जिया खानने आपल्या सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीचा उल्लेख केला होता. तिचे आणि सूरजचे एकमेकांवर कसे प्रेम होते आणि नंतर अभिनेता तिच्यासोबत कसे वागू लागला, हे तिने या नोटमध्ये लिहिले होते. सूरजने एकदा आपल्याला घरातून हाकलून दिल्याचेही सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे. सूरजचा हाच बदलता स्वभाव आपल्याला सहन होत नसल्याचे देखील जियाने म्हटले होते. यावरून सूरज पंचोलीने जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. मात्र, मुंबईच्या सीबीआय विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली आहे.

Comments
Add Comment

कुलाबा सांडपाणी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या खरेदीसाठी संस्थांच्या उड्या; प्रति हजार लिटरसाठी १५ रुपयांचा दर आकारला जाणार

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने समुद्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलजल प्रक्रिया

अनाया बांगरचा शस्त्रक्रिया करत मोठा निर्णय, देशातील पहिलंच प्रकरण नेमकं काय?

मुंबई: माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनायाचा

अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित मुलींना मोठा दिलासा

लातूर : राज्य सरकारने सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता राज्य सरकारी

सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली उघड; कर्मचारीच....

मुंबई : प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात चोरीची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील हॉटेल, उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील