कुर्ली - घोणसरी धरणग्रस्तांना मिळणार जास्तीत जास्त मोबदला

कणकवली (प्रतिनिधी) : कुर्ली-घोणसरी धरणाच्या कालव्याचे प्रश्न आणि फोंडाघाट, घोणसरी,लोरे, वाघेरी पियाळी या गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत संबधित अधिकारी, शेतकरी यांची बैठक घेऊन चर्चा केली. भूसंपादनाचा मोबदला यापूर्वी जमीन मालकांना खूपच कमी दिला असून तो जास्तीत जास्त देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली. कालवा कॅनॉल पद्धतीने बनवावा, तो बंदिस्त पाइपलाइन पद्धतीचा नको यावर चर्चा झाली, तर २०१६ साली भूसंपादन न करताच शेतकऱ्यांच्या जमिनीतून कॅनॉल खोदण्यात आला, त्याचा मोबदला अद्यापही दिलेला नाही. तो योग्य मोबदलासुद्धा त्वरित द्यावा, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान जास्तीत जास्त मोबदला देण्याविषयीचा प्रस्ताव तयार करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले.


सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या दालनात भाजपचे कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कुर्ली-घोणसरी धरणाच्या डाव्या तीर कालव्याची बैठक झाली. या बैठकीला पुनर्वसन अधिकारी श्रीमती सिंगाडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हर्षद यादव, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी सभापती तुळशीदास रावराणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,आबू पटेल, सुनील लाड, पांचाळ, श्रीपादकर आदींसह फोंडा पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.


कुर्ली, घोणसरी धरणाच्या कालव्यात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. भूसंपादन योग्य पद्धतीने केले नाही. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. काही वर्षांपूर्वी भूसंपादन न करताच कालव्याची खोदाई करण्यात आली. त्याचाही मोबदला दिलेला नाही. पाईपलाईन पद्धतीने कालवा केला जाण्याची शक्यता असून त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. ओपन कॅनॉल तयार करून कालवा काढला जावा, असे यावेळी चर्चात सांगण्यात आले. अशा अनेक मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार : मंत्री नितेश राणे

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर वसलेले हे संस्थान कालीन शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी माझे

Sindhudurg : आंबोली घाटात दरड कोसळून दगड रस्त्यावर; वाहतूक मंदावली

सिंधुदुर्ग : पावसाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना आंबोली घाटात मुख्य धबधबा

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

महाराष्ट्राची 'ब्लू इकॉनॉमी' देणार चीन-जपानला टक्कर; मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे; मच्छिमारांच्या हिताला बाधा न पोहोचवता कोकण किनारपट्टीचा जागतिक विकास करणार मुंबई (सुहास