ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चाना उधाण


मुंबई : राष्ट्रवादीमधील आमदार व ठाकरे गटातील आमदार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांच्या वक्तव्याने नव्या राजकीय चर्चाना उधाण आले असून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात भूंकप होईल अशी बातमी समोर आली आहे.


खारघर घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवले जाईल, अशा चर्चाना उधाण आले होते. याबाबत मंत्री सामंत यांना विचारण्यात आले. यावेळी बोलताना सामंत म्हणाले, या सगळ्या निरर्थक चर्चा आहेत. असे काही नाही आहे.


उलट ठाकरे गटातली उरलेले १३ आमदार हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच हा गौप्यस्फोट करतानाच चर्चा भरपूर होऊ शकतात पण ते सत्यात उतरले पाहिजे, असे उदय सामंत म्हणाले.


राज्यातील राजकारणात कधी काय होईल, हे कोणी सांगू शकत नाही. दररोज वेगवेगळ्या राजकीय घटना घडत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक आमदार पुन्हा ठाकरेंच्या गटात परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. पक्ष सोडून गेलेले कुणी परत येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ घेतील, असे सूचक विधान ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. एकीकडे हे सगळे सुरू असताना आता दुसरीकडे मात्र उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी