विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हवालदिल!

विदर्भ : महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गारपिटीमुळे २६ एप्रिलपासून यलो व ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार या भागात वार्‍याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहील. राज्यात उर्वरित भागात मुंबई व नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जाहीर केला आहे. इथे वार्‍याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहील.


मध्य प्रदेश, महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत सभोवतालच्या परिसरावर ९०० मीटर उंचीवर गोलाकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने पावसाचे वातावरण आहे.


नाशिक जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागात आणखी दोन दिवस गारपीट, अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा राहणार असल्याचा अंदाज इगतपुरी भात संशोधन केंद्र व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.


नांदेड, हिंगोली, परभणी व बीड, जालना जिल्ह्यात मंगळवारी गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील कंधार व किनवट तालुक्यात वीज पडून ५ जनावरे दगावली. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या झाडांचे नुकसान झाले. मराठवाड्यात गारपीट, सोसाट्याच्या वार्‍यामुळे घरावरील पत्रे उडाले.



पुढील दोन दिवसांत हवामान खात्याने २७ एप्रिलला दक्षिणेकडील केरळ, तेलंगणमध्ये आणि २८ एप्रिलला ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, तेलंगण, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.


पुढील आठवड्यात देशभरात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मार्च ते जूनपर्यंत उष्णतेची लाट असते. मान्सून उशिरा सुरु झाल्यास जुलैमध्येदेखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असते. यंदा एप्रिल महिन्यात तीव्र ऊन कमी प्रमाणात होते. शिवाय पुढील आठवड्यात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार ; वनविभागाची कारवाई

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र