विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेती व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हवालदिल!

  501

विदर्भ : महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गारपिटीमुळे २६ एप्रिलपासून यलो व ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार या भागात वार्‍याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहील. राज्यात उर्वरित भागात मुंबई व नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जाहीर केला आहे. इथे वार्‍याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहील.


मध्य प्रदेश, महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत सभोवतालच्या परिसरावर ९०० मीटर उंचीवर गोलाकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने पावसाचे वातावरण आहे.


नाशिक जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. या भागात आणखी दोन दिवस गारपीट, अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा राहणार असल्याचा अंदाज इगतपुरी भात संशोधन केंद्र व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.


नांदेड, हिंगोली, परभणी व बीड, जालना जिल्ह्यात मंगळवारी गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील कंधार व किनवट तालुक्यात वीज पडून ५ जनावरे दगावली. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या झाडांचे नुकसान झाले. मराठवाड्यात गारपीट, सोसाट्याच्या वार्‍यामुळे घरावरील पत्रे उडाले.



पुढील दोन दिवसांत हवामान खात्याने २७ एप्रिलला दक्षिणेकडील केरळ, तेलंगणमध्ये आणि २८ एप्रिलला ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, तेलंगण, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.


पुढील आठवड्यात देशभरात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मार्च ते जूनपर्यंत उष्णतेची लाट असते. मान्सून उशिरा सुरु झाल्यास जुलैमध्येदेखील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती असते. यंदा एप्रिल महिन्यात तीव्र ऊन कमी प्रमाणात होते. शिवाय पुढील आठवड्यात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा