उसरोलीचा सरपंच अँटिकरप्शनच्या जाळ्यात

मुरूड : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांना शेतक-याकडून गांडूळ खतासाठी शेड च्या परवानगी घेण्यासाठी पन्नास हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत शेतीसाठी तक्रारदार शेतकरी याला गांडूळ खतासाठी शेड तयार करायची होती. त्यासाठी त्याने उसरोली ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता. सदर परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग रायगडने रंगेहाथ पकडले आहे. यासाठी पंचाहत्तर हजाराची मागणी करण्यात आली होती.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ठाणे परिक्षेत्र) चे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे, पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, पोहवा अरुण करकरे,पोहवा विनोद जाधव, पोहवा महेश पाटील, पोना विवेक खंडागळे, पोना जितेंद्र पाटील यांनी सापळा रचून कारवाई यशस्वी केली.


रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली तर तात्काळ दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२३३१ / टोल फ्री क्र. १०६४ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टीकरप्शन ब्युरो, रायगड तर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या