उसरोलीचा सरपंच अँटिकरप्शनच्या जाळ्यात

मुरूड : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांना शेतक-याकडून गांडूळ खतासाठी शेड च्या परवानगी घेण्यासाठी पन्नास हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत शेतीसाठी तक्रारदार शेतकरी याला गांडूळ खतासाठी शेड तयार करायची होती. त्यासाठी त्याने उसरोली ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता. सदर परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग रायगडने रंगेहाथ पकडले आहे. यासाठी पंचाहत्तर हजाराची मागणी करण्यात आली होती.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ठाणे परिक्षेत्र) चे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे, पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, पोहवा अरुण करकरे,पोहवा विनोद जाधव, पोहवा महेश पाटील, पोना विवेक खंडागळे, पोना जितेंद्र पाटील यांनी सापळा रचून कारवाई यशस्वी केली.


रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली तर तात्काळ दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२३३१ / टोल फ्री क्र. १०६४ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टीकरप्शन ब्युरो, रायगड तर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित