बेस्ट बसमधील विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा होणार लिलाव

मुंबई (प्रतिनिधी) : विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंच्या लिलावासह बेस्टतर्फे बसगाड्या, जीप भंगारात विक्रीस काढल्या जाणार आहेत. बेस्ट बसमध्ये प्रवासी विसरलेल्या या वस्तू सर्वसामान्यांना घेता येणार नसून घाऊक (लॉटमध्ये) बड्या व्यापाऱ्यांना या वस्तू लिलावात घेता येणार आहेत. एकूण २४५ बसगाड्या विक्रीस काढण्यात येणार असून ३० जीप व १३ लॉरीज बेस्टने विक्रीस काढल्या आहेत.


स्मार्ट मोबाइल, लॅपटॉप, ब्रँडेड वस्तू या बेस्ट बसमध्ये प्रवासी विसरलेल्या वस्तूंचा बंपर लिलाव बेस्टतर्फे लवकरच होणार आहे. अगदी पेन, कपडे, पाण्याची बॉटल ते हजारो रुपयांच्या किंमती वस्तू प्रवासी बसमध्ये विसरतात. घाईगडबडीत अनेक प्रवासी आपल्या किंमती वस्तू बेस्ट बसमध्ये विसरतात. वस्तू बेस्ट बसमध्ये विसरल्यानंतर अनेक प्रवासी बेस्ट बस आगारात संपर्क साधतात आणि गहाळ वस्तू परत मिळवतात. अनेक प्रवासी विसरलेली वस्तू परत मिळणार नाही, असा विचार करतात; परंतु प्रवाशाने संपर्क साधल्यावर ठोस पुरावा दिल्यानंतर संबंधित प्रवाशाला ठरलेले दर आकारून वस्तू परत दिली जाते. मात्र जे प्रवासी आपली वस्तू घेण्यासाठी येतच नाही, अशा प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.



१४७ घड्याळे, २९५१ छत्र्या, १३० स्मार्ट फोन, विविध कंपन्यांचे १ हजार २८४ मोबाईल, इयर फोन, डोंगल, कपडे, हॅलमेंट, फेस शिल्ड, लेडीज चप्पल, पाण्याची बॉटल यांचा बंपर लिलाव होणार आहे. तसेच ब्लू टूथ, इयर फोन, की बोर्ड व माऊस -पॉवर बँक, लॅपटॉप, कॅमेरा स्टॅन्ड, की बोर्ड, कॅल्क्युलेटर या महागड्या वस्तू लिलावात असतील.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण