बेस्ट बसमधील विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा होणार लिलाव

  181

मुंबई (प्रतिनिधी) : विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंच्या लिलावासह बेस्टतर्फे बसगाड्या, जीप भंगारात विक्रीस काढल्या जाणार आहेत. बेस्ट बसमध्ये प्रवासी विसरलेल्या या वस्तू सर्वसामान्यांना घेता येणार नसून घाऊक (लॉटमध्ये) बड्या व्यापाऱ्यांना या वस्तू लिलावात घेता येणार आहेत. एकूण २४५ बसगाड्या विक्रीस काढण्यात येणार असून ३० जीप व १३ लॉरीज बेस्टने विक्रीस काढल्या आहेत.


स्मार्ट मोबाइल, लॅपटॉप, ब्रँडेड वस्तू या बेस्ट बसमध्ये प्रवासी विसरलेल्या वस्तूंचा बंपर लिलाव बेस्टतर्फे लवकरच होणार आहे. अगदी पेन, कपडे, पाण्याची बॉटल ते हजारो रुपयांच्या किंमती वस्तू प्रवासी बसमध्ये विसरतात. घाईगडबडीत अनेक प्रवासी आपल्या किंमती वस्तू बेस्ट बसमध्ये विसरतात. वस्तू बेस्ट बसमध्ये विसरल्यानंतर अनेक प्रवासी बेस्ट बस आगारात संपर्क साधतात आणि गहाळ वस्तू परत मिळवतात. अनेक प्रवासी विसरलेली वस्तू परत मिळणार नाही, असा विचार करतात; परंतु प्रवाशाने संपर्क साधल्यावर ठोस पुरावा दिल्यानंतर संबंधित प्रवाशाला ठरलेले दर आकारून वस्तू परत दिली जाते. मात्र जे प्रवासी आपली वस्तू घेण्यासाठी येतच नाही, अशा प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.



१४७ घड्याळे, २९५१ छत्र्या, १३० स्मार्ट फोन, विविध कंपन्यांचे १ हजार २८४ मोबाईल, इयर फोन, डोंगल, कपडे, हॅलमेंट, फेस शिल्ड, लेडीज चप्पल, पाण्याची बॉटल यांचा बंपर लिलाव होणार आहे. तसेच ब्लू टूथ, इयर फोन, की बोर्ड व माऊस -पॉवर बँक, लॅपटॉप, कॅमेरा स्टॅन्ड, की बोर्ड, कॅल्क्युलेटर या महागड्या वस्तू लिलावात असतील.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई: गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वताच्या पाचव्या भागात श्री दत्तात्रेय भगवान यांचे तपश्चर्या स्थान

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात