माझ्या अभिनयाचा टर्निंग पॉइंट म्हणाल, तर माझ्या अभिनयाची सुरुवात झाली, जेव्हा मी आठ-नऊ वर्षांची असेन, तेव्हा मी तिसरीत होते, मी मूळची बेळगावची. तेव्हा बेळगावला, ‘रायगडला जेव्हा जाग येते’ हे नाटक बसविले जात होते. त्यात मला शिवाजी महाराजांच्या छोट्या मुलाची राजारामची भूमिका मिळाली होती. ते मी नाटक केले. त्याचे भरपूर प्रयोग बेळगावला व इतर ठिकाणी झाले. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी माझे फार कौतुक केले. मला ते फार आवडलं. त्यानंतर मी ठरवले की, मला अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्या नाटकापासून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली. तेव्हा मला अभिनयाची जास्त संधी बेळगावमध्ये मिळाली नाही. माझी आई वीणा लोकूर या क्षेत्रामध्ये असल्याने तिने ‘फुलोरा’ ही नाट्यसंस्था सुरू केली होती. त्यामुळे तिच्याबरोबर मी भरपूर बालनाट्य केले. बालनाट्य करता करता मी मुंबईला ऑडिशन देण्यासाठी जाऊ लागले. बालकलाकार म्हणून मला मुंबईला भरपूर कामे मिळाली. मालिका, जाहिरात, चित्रपट मिळाले. त्यानंतर रूपारेल कॉलेजमधून मी कॉमर्स स्नातक झाले.
माझ्या करिअरमधला टर्निंग पॉइंट म्हणाल तर तो आहे, ‘बिग बॉस सीझन १.’ बिग बॉसच्या अगोदर मी सहा-सात मराठी चित्रपट केले होते. एक बॉलिवूड चित्रपट देखील केला होता. खूप स्टेज शो केले होते. पण, मी लोकांपर्यंत पोहोचले नव्हते; परंतु जेव्हा मी ‘बिग बॉस’मध्ये काम केले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील माणसे मला ओळखू लागली. सई लोकूर कोण आहे, हे लोकांना माहीत होतं. ती ओळख मला मिळाली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचले. मी बिल्डिंगमधून खाली भाजी आणायला आले की, फॅन्स माझ्याकडे येऊन माझ्यासोबत फोटो काढायचे. हे आधी कधीच घडल नव्हतं. हे फॅन्सचे प्रेम मला नक्कीच बिग बॉसमुळे मिळाले.
माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणाल तर तो आहे. ‘कोविड’ जानेवारी २०२० मध्ये मला स्लीप डिस्कचा खूप त्रास सुरू झाला होता. मुंबईमध्ये मला डॉक्टरने बॅक रेस्ट सांगितले होते. त्या बॅक रेस्टसाठी मी आईबाबाकडे बेळगावला आले. मी फेब्रुवारीमध्ये बेळगावला आले आणि मार्चमध्ये ‘लॉकडाऊन’ सुरू झाला. लॉकडाऊनमध्ये मला कळेना काय करावे? लॉकडाऊनमध्ये लग्नाच्या वेबसाइटवरून माझं व दीप रॉयचे सूर जुळले व दोन महिन्यांच्या आत आम्ही लग्नाच्या रेशीमगाठीत बांधलो गेलो. त्यानंतर माझं आयुष्य बदलत गेलं. दीप आयटीमध्ये आहे. त्यावेळी बंगलोरला लॉकडाऊन होता, त्यामुळे तो बेळगावला शिफ्ट झाला व घरून काम करू लागला. मी देखील घरून अनेक ब्रॅण्डेड वस्तूंच्या जाहिराती करू लागले. माझ्या सोशल मीडियावर त्या पोस्ट करू लागले. अशा प्रकारे काम केल्याचे समाधान देखील मला मिळत आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…
बांदीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारताच्या सुरक्षा पथकांनी जम्मू…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात…