'ईद' कधी साजरी करणार?

  352

नवी दिल्ली : रमजानचा महिना संपत आला असून आता भारतात 'ईद' अर्थात ईद-उल-फित्र कधी साजरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंतर, जगभरातील मुस्लिम नवीन चंद्र दिसण्याची, ज्याला चांद रात म्हणतात, आतुरतेने वाट पाहत आहेत. चंद्र दिसल्यानंतर ईद साजरी करण्यात येते.


त्याआधी ईद उल फित्रची सामूहिक नमाज शनिवारी सकाळी होणार आहे. लखनौच्या इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने नमाजची वेळ जारी केली आहे. जामा मशीद इदगाह येथे दुपारी १२.४५ वाजता नमाज अदा होईल. त्याचवेळी मौलाना सैफ अब्बास यांनी सांगितले की, मस्जिद अबूतालिब आणि आसिफी मशिदीमध्ये दुपारी १२.१० वाजता नमाज अदा होणार आहे.


ईदसाठी घराघरांत जय्यत तयारी झाली आहे. ईदची तारीख चंद्र दर्शनावर अवलंबून असल्याने २१ एप्रिलला चंद्र दिसला तर ईदचा आनंद २२ एप्रिलला साजरा होईल. चंद्र न दिसल्यास २३ एप्रिलला ईद असेल. भारतात ईद-उल-फित्र २२ तारखेला साजरी केली जाईल, असे इंडिया युनियन मुस्लिम लीगचे राज्य अध्यक्ष सय्यद सादिक अली शिहाब थांगल यांनी सांगितले.


ईद-उल-फित्र २२ एप्रिल रोजी साजरी करणार


इंडिया युनियन मुस्लिम लीगचे राज्य अध्यक्ष सय्यद सादिक अली शिहाब थांगल यांनी गुरुवारी शव्वाल चंद्रकोर चंद्र दिसला नसल्याचे नमूद केले. याचा अर्थ मुस्लिमांना आणखी एक दिवस उपवास ठेवावा लागेल आणि २२ एप्रिल रोजी शुभ सण साजरा करावा लागेल.


सौदी अरेबियात शुक्रवारी तर पाकिस्तानमध्ये शनिवारी ईद-उल-फित्र साजरी करणार


भारताप्रमाणेच पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये घोषणा केली की शनिवारी ईद उल-फित्र साजरी केली जाईल. सौदी अरेबियाने शुक्रवारी ईद-उल-फित्र साजरी करण्याची घोषणा केली. संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांनी जाहीर केले की त्यांच्यासाठी शुक्रवारी सुट्टी सुरू होईल, तर त्यांचे आखाती अरब शेजारी ओमानने घोषित केले की चंद्र दिसला नाही आणि सुट्टी शनिवारपासून सुरू होईल. युएई मध्ये लोकांना ईद साजरी करण्यासाठी ४ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )