श्रेयस अय्यर तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार

लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाठीच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलेला भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र असे असले तरी तो डब्ल्यूटीसीची फायनल खेळणार नसल्याचे समजते.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील अहमदाबाद कसोटीत जवळपास पूर्ण दोन दिवस मैदानावर घालवल्यानंतर अय्यरने पाठीच्या खालच्या भागात सूज आल्याची तक्रार केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत तो फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरवर मंगळवारी लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर असेल. त्यामुळे आता अय्यरला जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर राहावे लागणार आहे.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या