श्रेयस अय्यर तीन महिने क्रिकेटपासून दूर राहणार

लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाठीच्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलेला भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र असे असले तरी तो डब्ल्यूटीसीची फायनल खेळणार नसल्याचे समजते.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेतील अहमदाबाद कसोटीत जवळपास पूर्ण दोन दिवस मैदानावर घालवल्यानंतर अय्यरने पाठीच्या खालच्या भागात सूज आल्याची तक्रार केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत तो फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. पाठीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरवर मंगळवारी लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तो जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर असेल. त्यामुळे आता अय्यरला जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतून बाहेर राहावे लागणार आहे.

Comments
Add Comment

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.