मानलं बुवा! 'या बाबतीत' भारताने जगाला मागे टाकले!

चीनचा विक्रमही मोडला!


नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (युएनएफपीए) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा २.९ दशलक्षांनी जास्त झाली आहे. यामुळे भारत जगातील (world population) सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.


युएनएफपीएने 'द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, २०२३' रिपोर्ट प्रकाशित केला आहे. याचे शीर्षक '८ बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस' असे आहे. हा रिपोर्ट युएनने आजच जाहीर केला आहे. अहवालातील ताजी आकडेवारी 'डेमोग्राफिक इंडिकेटर्स' या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे.


ही संस्था १९५० पासून जगातील लोकसंख्येची माहिती गोळा करत आहे. यामध्ये एवढ्या वर्षांत पहिल्यांदाच चीनला भारताने मागे टाकले आहे. भारताने चीनला कधी मागे टाकले हे सांगता येत नसल्याचे, युएनएफपीएच्या माध्यम सल्लागार एन्ना जेफरीज यांनी म्हटले आहे. भारताची लोकसंख्या आता १ अब्ज ४२ कोटी ८६ लाख आहे, तर चीनची लोकसंख्या आता १ अब्ज ४२ कोटी ५७ लाख आहे. अशा प्रकारे दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये २९ लाखांचा फरक आहे.


दोन्ही देशांची तुलना करणे कठीण आहे. कारण दोन्ही देशांच्या माहिती गोळा करण्यात थोडेसे अंतर आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर होती, परंतू ती यंदा कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे भारताची लोकसंख्या वाढत चालली आहे. असे असले तरी १९८० पेक्षा वाढीचा वेग कमी आहे. म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर पूर्वीपेक्षा कमी आहे. हाच काय तो दिलासा म्हणावा लागणार आहे.

Comments
Add Comment

बांगलादेशमध्ये उस्मान हादी पाठोपाठ मोहम्मद मोतालेब शिकदारची हत्या

ढाका : बांगलादेशमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी

दक्षिण आफ्रिकेत गोळीबारात १० जण ठार

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलियामध्ये बाँडी बीचवर बेछूट गोळीबार करण्याची घटना ताजी असतानाच आता दक्षिण आफ्रिकेतील

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने

बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा कहर; नेत्याचं घर पेटवलं, ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

ढाका : बांगलादेश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला असून लक्ष्मीपूर सादर उपजिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना

पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेस बॉम्बस्फोट करुन उडवण्याचा प्रयत्न, बलुचिस्तानमध्ये रेल्वे ट्रॅकचे नुकसान

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधून एक धक्कादायक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जाफर एक्सप्रेस या

बांगलादेशात हिंदू तरुणाची निर्घृण हत्या! १० आरोपींना अटक, युनुस सरकार काय निर्णय घेणार ?

ढाका: बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या घटनेनंतर, आतापर्यंत दहा