राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होणार

नवीन शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम


शाळा वाचविण्यासाठी घोषणांचा पाऊस


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील अनुदानित शाळांना २ मे २०२३ पासून १४ जून पर्यंत उन्हाळी सुट्टी लागणार असून १५ जून २०२३ पासून शाळा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.


राज्यातील शाळा आधी १२ जूनपासून सुरू होणार होते. मात्र, शिक्षण विभागाने बदल करत आता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहे. मुलांना त्यांची उन्हाळ्याची सुट्टी चांगल्या पद्धतीने नियोजन करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केसरकर यांनी सांगितले.



येत्या शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम


राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे आणि मुलांना शिक्षणासोबत इतर विविध ज्ञान मिळावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.



शाळा वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील


शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे.

Comments
Add Comment

जळगावमध्ये महापौर आरक्षणाची टांगती तलवार

जळगाव: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. आता शहरात

Nashik Accident : शिर्डीला साई बाबांच दर्शन घेतल अन् घरी परताना रस्त्यामध्येच...चौघे जागेवरच ठार!

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील आंबेगन शिवाराजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी दोन वाहनांची समोरासमोर भीषण

धाडसाचे अमाप कौतुक! ११ वर्षांच्या भावाने बिबट्याच्या तावडीतून वाचवला बहिणीचा जीव

सांगली : सध्या महाराष्ट्रात बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक आई बाबानी आपली

बुलढाण्यात लाडकी बहीण योजेनचा लाभ घेणाऱ्या महिलांना झटका; सरकारची कडक कारवाई

बुलढाणा : राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक पाठबळ मिळाव यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली. या योजनेचा

पुणेकरांचा बोपदेव घाट वाहतुकीसाठी ७ दिवस बंद; वाहतुकीत होणार 'हे' बदल

पुणे : पुण्यातील वाहतुकीत सध्या मोठा बदल करण्यात आला आहे. याच कारण म्हणजे पुण्यातील पुणे - सासवड ला जोडणारा बोपदेव

इम्तियाज जलील यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांचा हल्ला

काळे झेंडे दाखवत नाराजांचा राडा छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून