राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होणार

नवीन शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम


शाळा वाचविण्यासाठी घोषणांचा पाऊस


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील अनुदानित शाळांना २ मे २०२३ पासून १४ जून पर्यंत उन्हाळी सुट्टी लागणार असून १५ जून २०२३ पासून शाळा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.


राज्यातील शाळा आधी १२ जूनपासून सुरू होणार होते. मात्र, शिक्षण विभागाने बदल करत आता राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहे. मुलांना त्यांची उन्हाळ्याची सुट्टी चांगल्या पद्धतीने नियोजन करता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केसरकर यांनी सांगितले.



येत्या शैक्षणिक वर्षात नवनवीन उपक्रम


राज्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे आणि मुलांना शिक्षणासोबत इतर विविध ज्ञान मिळावे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.



शाळा वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील


शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा