बस झाले दौरे, नुकसान भरपाई द्या!


  • संतोष जाधव


सटाणा : मागिल आठवड्यात बागलाण तालुक्याला सर्वत्र गारपिटीने व अवकाळी पावसाने झोडपल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा या गारपिटीने अस्मानी संकटात सापडला आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व बळीराजाला दिलासा देण्यासाठी बळीराजाच्या थेट बांधावर राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार यांनी पायधूळ झाडली. आश्वासनांची खैरात केली. बळीराजाला थेट नुकसान भरपाई मात्र अद्याप मिळाली नाही. आर्थिक मदत कधी देणार अशी याची वाट दुःखाच्या खाईत सापडलेला बळीराजा आजही बघतो आहे.


मागिल काही दिवसांपासून बागलाण तालुक्यातील सर्वच भागात जोरदार गारपिट व अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, पपई, आंबे, यांचे नुकसान झाले होते. मागील आठवड्यात तालुक्यात सर्वदूर कांदा काढण्याचे काम सुरू होते. नेमका तोच हाती आलेला कांदा डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे.


कोसळणारे कांद्याचे भाव, कवडीमोल दराने विकले जाणारे द्राक्ष, हाती येत असलेले डाळींब व आंबे हे या गारपिटीचे व अवकाळी पावसाचे बळी ठरले. यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले होते. केवळ नुकसान झालेल्या पिकाकडे हताश होऊन बघण्याशिवाय बळीराजाकडे पर्याय नवताच.


या अवकाळी गारपिटीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत घेतली आणि ते थेट तालुक्यातील निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व अधिकारी वर्गाचा लवाजमा सोबत घेऊन तीन दिवसात पंचनामे करून तसा तातडीने अहवाल पाठवावा असे आदेश देवून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, भाजपाचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात थेट बांधावर जावून या नुकसानीचा फक्त आढावा घेतला व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देवू असे आश्वासन शेतकऱ्यांना देत फोटो सेशन करून गेले.


अगदी मुख्यमंत्री ते माजी आमदार यांनी दिलेले आश्वासन कधी पुर्ण होणार? नुकसानभरपाई थेट आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला कधी मिळणार? याकडे तालुक्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे. बस झाले पहाणी दौरे, आता आर्थिक मदत करा, असा टाहो बळीराजा फोडतो आहे.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला - उपमुख्यमंत्री अजित