राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी : मुख्यमंत्री

  169

नवी मुंबई: राजकीय शक्तीपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा गौरव केला. आज नवी मुंबईत निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह धर्माधिकारी यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढला आहे. महासागरासमोर काय बोलावं कळत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर श्री परिवारातील सदस्य म्हणून बोलतोय. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी अमित शाह यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


धर्माधिकारी कुटुंबियांनी कायमच भरकटलेल्या माणसांना मार्ग दाखवला आहे. ते एक दिपस्तंभ असून त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची