माजी पंतप्रधान डाव्यांसोबत जाणार, कर्नाटकाच्या निवडणूकीत मोठा ट्वीस्ट

बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणूक ऐन रंगात येत असताना जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी महत्वाची घोषणा केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डावे पक्ष ज्या गटाला समर्थन देतील किंवा बाजुने उभे राहतील त्यांना जेडीएस समर्थन देईल अशी घोषणा देवेगौडा यांनी केली आहे. देवेगौडा यांनी अशाप्रकारे डाव्यांचे उपकार फेडले आहेत.


१९९६ साली एचडी देवेगौडा अचानक देशाचे पंतप्रधान बनले होते. खरंतर, तेव्हा डाव्या पक्षांचे नेते ज्योती बसू यांना पंतप्रधान होण्याची संधी होती. परंतू, त्यावेळी बसू यांनीच देवेगौडांचे नाव पुढे केले व देवेगौडा पंतप्रधान बनले. यामुळे आता कर्नाटक निवडणूकीत देवेगौडा तेव्हाचे उपकार फेडले आहेत.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता एक वर्ष शिल्लक राहिले आहे. यानिवडणुकीसाठी विरोधी पक्ष भाजपाविरोधात मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्नात आहे. यामध्ये शरद पवार, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव सक्रीय आहेत. या निवडणूकांच्या वेळी कोणाला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करायचे हे जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल यावर अवलंबून आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले