मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी शेकडो भांडी गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयातच मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात, ती परत केली जात नाहीत. अधिकारी घरी गेल्यावर ताटं आणि चमचे चोरीला जातात. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली असून कंत्राटदाराचे हजारोंचे नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून, भांडी आणि चमचे घरी घेऊन जाऊ नका, असा फलकच कंत्राटदाराने पालिका मुख्यालयात लावला आहे.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जे मुख्य कॅन्टीन आहे. त्यामध्ये ५० पेक्षा जास्त लोक बसू शकतात. मात्र याच महापालिकेमध्ये ५० पेक्षा अधिक विविध विभागाची कार्यालये आहेत. त्यामध्ये जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत. ते थेट कॅन्टीनमधील जेवण आणि भांडी घेऊन आपल्या कार्यालयात जातात. मात्र ही भांडी पुन्हा कॅन्टीनमध्ये परत येत नाहीत.
दरम्यान वर्षभरात आतापर्यंत त्याचा हिशोब काढला तर ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ६ ते ७ हजार चमचे, १५० ते २०० ताट, ३०० ते ४०० नाश्ता प्लेट, १०० ते १५० ग्लास ही भांडी गायब झाली आहेत. त्यामुळे थेट उपहार गृहाच्या समोरच्या बाजूस भांडी घेऊन जाऊ नका! अशी सूचना लिहीली आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…