मुंबईला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

  135

विजांच्या कडकडाटासह पाऊस, अनेक भागात साचले पाणी


मुंबई : मुंबईत अनेक भागात बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.


मुंबईच्या अनेक भागात बुधवारी मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले. वाहनचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागले. हा अनपेक्षित पण, सूचित हवामान बदल पाहून शहरातील नागरिकही हैराण झाले.


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतातला गहू, हरभरा, फळांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)