गिरीश महाजन यांना धक्का! जळगाव मनपात भाजपचे चार नगरसेवक अपात्र

  153

जळगाव : जळगाव जिल्हा न्यायालयाने महापालिकेतील भारतीय जनता पार्टीचे तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक असलेले चार नगरसेवक अपात्र ठरवले आहेत. दरम्यान, हा गिरीश महाजनांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.


जळगाव महापालिकेतील बहुचर्चेतील घरकुल घोटाळा प्रकरणी पाच नगरसेवकांना शिक्षा झाली होती. यातील शिक्षा झालेल्या नगरसेवकांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई अशी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल होती. याप्रकरणी जिल्ह्या न्यायालयाने आज १३ एप्रिल रोजी निकाल देत पाच पैकी चार नगरसवेकांना अपात्र ठरवले आहे. याचिकाकर्त्यांकडून ॲड. सुधीर कुलकर्णी यांनी काम पाहिले.


याबाबत बोलताना तक्रारदार नगरसेवक प्रशांत नाईक म्हणाले, जळगाव महानगरपालिकेतील पाच नगरसेवकांविरुद्ध जळगाव जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी दाद मागितली होती. न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे आज न्यायालयाने निकाल दिला आहे. पाच नगरसेवकांपैकी दत्तू कोळी यांच्या शिक्षेला स्थगिती असल्यामुळे इतर चार नगरसेवक लता भोईटे, भगत बालानी, कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे यांना न्यायालयाने अपात्र ठरवले आहे. घरकुल घोटाळ्यामध्ये न्यायालयाने नगरसेवकांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावली होती त्यामुळे ते नगरसेवक राहण्यास अपात्र होते. आता न्यायालयात अपात्र झाल्याने इतर नगरसेवकांना देखील यातून बोध मिळेल.

Comments
Add Comment

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी