डॉ. आंबेडकर प्रतिमेचे नाणे पुन्हा सुरू करण्याची मागणी‎

  438

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा‎ असलेले नाणे जन्मशताब्दी‎ वर्षानिमित्त केंद्र सरकारने १९९० मध्ये चलनात‎ आणले होते. मात्र २३ वर्षानंतर सदर नाणे‎ आज चलनातून गायब झाले‎ असल्यामुळे पुन्हा ते नाणे बाजारात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न‎ करावेत, अशी मागणी आता आंबेडकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जनतेमधून केली जात आहे.


भारताच्या इतिहासामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. डॉ. बाबासाहेब थोर राजनीतिज्ञ, समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्त १९९० मध्ये भारत सरकारने “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९९०-९१ हे वर्ष आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने या निमित्ताने १९९० साली‎ काढलेले ते एक रुपयांचे नाणे‎ आता बाजारातून गायब झाले आहे.‎


डॉ.‎ आंबेडकरांच्या जन्मशताब्दी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षांनिमित्त काढलेले ते एक रुपयाचे नाणे बाजारात आले तेव्हा, कवी राजानंद गडपायले‎ यांचे रुपया बंदा निगाला यंदा, नव्या‎ जमान्यात भीमराव माझा बघून‎ घ्यावा आणि मन माझं गेलय आनंदून, माझा भीम यात पाहून, हे नाणं दिसतंया शोभून, बाबा साहेबांच्या फोटून... अशी अनेक गीतं संविधान निर्माते डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वत्र‎ प्रचंड गाजली.


घराघरात ही गाणी आजही‎ वाजतात. अनेकांच्या ओठावर हे गाणे‎ सहज येऊ लागल्याने याचा जोरदार प्रचार‎ झाला. अनेकांना नाण्याविषयी‎ उत्सुकता लागली आणि डॉ. बाबासाहेब यांच्या प्रति असलेली श्रद्धा‎ म्हणून आंबेडकर अनुयायांनी हे‎ चलनी नाणे संग्रही ठेवले. अनेकांनी‎ त्याची फोटो फ्रेम करून देव्हाऱ्यात‎ ठेवल्याने हे नाणे बाजारात गेले नाही‎. त्यामुळे हे चलनी‎ नाणे बाजारात दिसेनासे झाले.‎


त्यामुळे पुन्हा यांची निर्मिती करत डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक रुपयाचे नाणे‎ बाजारात उपलब्ध करून घ्यावेत,‎ अशी मागणी आंबेडकरी जनतेतून‎ केली जात आहे.‎

Comments
Add Comment

सिंहगडावरुन बेपत्ता झालेला गौतम चार दिवसांनी दरीत जिवंत आढळला

पुणे : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून बेपत्ता झालेला २४ वर्षांचा गौतम गायकवाड जिवंत आहे. गौतम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, पुण्यात 27 ते 6 तारखेपर्यंत दारू बंदी

पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २७ ते ६

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.