डॉ. आंबेडकर प्रतिमेचे नाणे पुन्हा सुरू करण्याची मागणी‎

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा‎ असलेले नाणे जन्मशताब्दी‎ वर्षानिमित्त केंद्र सरकारने १९९० मध्ये चलनात‎ आणले होते. मात्र २३ वर्षानंतर सदर नाणे‎ आज चलनातून गायब झाले‎ असल्यामुळे पुन्हा ते नाणे बाजारात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न‎ करावेत, अशी मागणी आता आंबेडकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जनतेमधून केली जात आहे.


भारताच्या इतिहासामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. डॉ. बाबासाहेब थोर राजनीतिज्ञ, समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्त १९९० मध्ये भारत सरकारने “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९९०-९१ हे वर्ष आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने या निमित्ताने १९९० साली‎ काढलेले ते एक रुपयांचे नाणे‎ आता बाजारातून गायब झाले आहे.‎


डॉ.‎ आंबेडकरांच्या जन्मशताब्दी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षांनिमित्त काढलेले ते एक रुपयाचे नाणे बाजारात आले तेव्हा, कवी राजानंद गडपायले‎ यांचे रुपया बंदा निगाला यंदा, नव्या‎ जमान्यात भीमराव माझा बघून‎ घ्यावा आणि मन माझं गेलय आनंदून, माझा भीम यात पाहून, हे नाणं दिसतंया शोभून, बाबा साहेबांच्या फोटून... अशी अनेक गीतं संविधान निर्माते डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वत्र‎ प्रचंड गाजली.


घराघरात ही गाणी आजही‎ वाजतात. अनेकांच्या ओठावर हे गाणे‎ सहज येऊ लागल्याने याचा जोरदार प्रचार‎ झाला. अनेकांना नाण्याविषयी‎ उत्सुकता लागली आणि डॉ. बाबासाहेब यांच्या प्रति असलेली श्रद्धा‎ म्हणून आंबेडकर अनुयायांनी हे‎ चलनी नाणे संग्रही ठेवले. अनेकांनी‎ त्याची फोटो फ्रेम करून देव्हाऱ्यात‎ ठेवल्याने हे नाणे बाजारात गेले नाही‎. त्यामुळे हे चलनी‎ नाणे बाजारात दिसेनासे झाले.‎


त्यामुळे पुन्हा यांची निर्मिती करत डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक रुपयाचे नाणे‎ बाजारात उपलब्ध करून घ्यावेत,‎ अशी मागणी आंबेडकरी जनतेतून‎ केली जात आहे.‎

Comments
Add Comment

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ