डॉ. आंबेडकर प्रतिमेचे नाणे पुन्हा सुरू करण्याची मागणी‎

  433

मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा‎ असलेले नाणे जन्मशताब्दी‎ वर्षानिमित्त केंद्र सरकारने १९९० मध्ये चलनात‎ आणले होते. मात्र २३ वर्षानंतर सदर नाणे‎ आज चलनातून गायब झाले‎ असल्यामुळे पुन्हा ते नाणे बाजारात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न‎ करावेत, अशी मागणी आता आंबेडकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जनतेमधून केली जात आहे.


भारताच्या इतिहासामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. डॉ. बाबासाहेब थोर राजनीतिज्ञ, समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या आंबेडकरांच्या जन्मशताब्दी निमित्त १९९० मध्ये भारत सरकारने “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. १९९०-९१ हे वर्ष आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने या निमित्ताने १९९० साली‎ काढलेले ते एक रुपयांचे नाणे‎ आता बाजारातून गायब झाले आहे.‎


डॉ.‎ आंबेडकरांच्या जन्मशताब्दी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्षांनिमित्त काढलेले ते एक रुपयाचे नाणे बाजारात आले तेव्हा, कवी राजानंद गडपायले‎ यांचे रुपया बंदा निगाला यंदा, नव्या‎ जमान्यात भीमराव माझा बघून‎ घ्यावा आणि मन माझं गेलय आनंदून, माझा भीम यात पाहून, हे नाणं दिसतंया शोभून, बाबा साहेबांच्या फोटून... अशी अनेक गीतं संविधान निर्माते डॉ‎. बाबासाहेब आंबेडकर यांच्या‎ जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वत्र‎ प्रचंड गाजली.


घराघरात ही गाणी आजही‎ वाजतात. अनेकांच्या ओठावर हे गाणे‎ सहज येऊ लागल्याने याचा जोरदार प्रचार‎ झाला. अनेकांना नाण्याविषयी‎ उत्सुकता लागली आणि डॉ. बाबासाहेब यांच्या प्रति असलेली श्रद्धा‎ म्हणून आंबेडकर अनुयायांनी हे‎ चलनी नाणे संग्रही ठेवले. अनेकांनी‎ त्याची फोटो फ्रेम करून देव्हाऱ्यात‎ ठेवल्याने हे नाणे बाजारात गेले नाही‎. त्यामुळे हे चलनी‎ नाणे बाजारात दिसेनासे झाले.‎


त्यामुळे पुन्हा यांची निर्मिती करत डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक रुपयाचे नाणे‎ बाजारात उपलब्ध करून घ्यावेत,‎ अशी मागणी आंबेडकरी जनतेतून‎ केली जात आहे.‎

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक