मालवणीची ‘दंगल’ पूर्वनियोजित होती

पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड


मुंबई : मालाड मधील मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक कट रचून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीमधून उघडकीस आली आहे. त्याप्रमाणे आता अटक आरोपींच्या विरोधात नव्याने वेगवेगळी कलम लावण्यात येत आहेत.


मालवणीत दरवर्षी राम नवमी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र मिरवणूक ठराविक वस्तीजवळ आली असता मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक सुरू झाली होती. सर्व बाजूने दगडफेक होत होती.


यामुळे मिरवणूक तिथल्यातिथे थांबविण्यात आली आणि कोण दगडफेक करत आहे याचा कार्यकर्ते शोध घेऊ लागले. सोबत असलेले पोलीस ही शोध घेऊ लागले. यावेळी काही तरुण दगडफेक करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले. त्या दिवशी पोलिसांनी वीस जणांना अटक केली व गुन्हा नोंदवला. यात एकूण २०० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी २० जणांना अटक करून बाकीच्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या अटक आरोपीवर दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढील तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ही दगडफेक कट रचून केल्याचे आता चौकशीत उघडकीस आले आहे.


दगडफेक करणाऱ्यांचे काही म्होरके आहेत. त्यांनी आधीच लोकांची जमवाजमव केली होती. दगड आणून ठेवले होते. याबाबत दोन पोलिसांनी महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. मालवणी पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे एक शिपाई आणि मालवणी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल यांनी हे पुरावे गोळा केले आहेत. त्या आधारावर आता आरोपींच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपात बदल करण्यात येणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता