मालवणीची ‘दंगल’ पूर्वनियोजित होती

पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड


मुंबई : मालाड मधील मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक कट रचून केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीमधून उघडकीस आली आहे. त्याप्रमाणे आता अटक आरोपींच्या विरोधात नव्याने वेगवेगळी कलम लावण्यात येत आहेत.


मालवणीत दरवर्षी राम नवमी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी मात्र मिरवणूक ठराविक वस्तीजवळ आली असता मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक सुरू झाली होती. सर्व बाजूने दगडफेक होत होती.


यामुळे मिरवणूक तिथल्यातिथे थांबविण्यात आली आणि कोण दगडफेक करत आहे याचा कार्यकर्ते शोध घेऊ लागले. सोबत असलेले पोलीस ही शोध घेऊ लागले. यावेळी काही तरुण दगडफेक करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले. त्या दिवशी पोलिसांनी वीस जणांना अटक केली व गुन्हा नोंदवला. यात एकूण २०० जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी २० जणांना अटक करून बाकीच्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या अटक आरोपीवर दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढील तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ही दगडफेक कट रचून केल्याचे आता चौकशीत उघडकीस आले आहे.


दगडफेक करणाऱ्यांचे काही म्होरके आहेत. त्यांनी आधीच लोकांची जमवाजमव केली होती. दगड आणून ठेवले होते. याबाबत दोन पोलिसांनी महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. मालवणी पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे एक शिपाई आणि मालवणी पोलीस ठाण्याचे मिल स्पेशल यांनी हे पुरावे गोळा केले आहेत. त्या आधारावर आता आरोपींच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपात बदल करण्यात येणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील