मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बस अपघातात एक ठार ३ गंभीर जखमी

भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी पावणे सहा वाजता कामगारांना घेऊन जाणा-या मिनी बसने कंटेनरला धडक दिली. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृ्त्यू झाला असून २ महिला कामगारांसह चालक गंभीर जखमी झाले आहेत


भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी पावणे सहा वाजता हा अपघात झाला. कामगारांना भिवंडीकडे घेऊन येणाऱ्या मिनी बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने या बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली.


भिवंडी तालुक्यातील वाहूली येथे असलेल्या ॲमेझॉन या कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या महिला कामगारांना पहाटे घरी सोडण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरून मिनी बस निघाली होती. सोनाळे गावातील साईधाम चौक या ठिकाणी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्ता दुभाजक ओलांडून मुंबई नाशिक या वाहिनीवरील कंटेनरला जाऊन धडकली.


या मिनी बसमध्ये सहा महिला कामगार, एक महिला सुरक्षा कर्मचारी, एक पुरुष सुरक्षा कर्मचारी व चालक असे नऊ जण होते. या अपघातात पुरुष सुरक्षा कर्मचा-याचा जागेवर मृत्यू झाला असून बस चालक व दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे. तर इतर पाच महिलांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.


याप्रकरणी बेदरकारपणे बस चालवणाऱ्या चालकाविरोधात भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत