चेन्नईचा सात विकेट्सने विजय

  140

वानखेडेवर मुंबईचे गर्वहरण


मुंबई (प्रतिनिधी) : वानखेडे स्टेडियमच्या म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेट्स राखून पराभव करत वस्त्रहरण केले. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. मुंबईने दिलेले १५८ धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि ११ चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या १६ व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर मुंबईचा दुसरा पराभव होय.


मुंबईकर अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या मैदानावर झंझावाती फलंदाजी केली. अजिंक्यने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच अजिंक्यने दमदार कामगिरी केली. मुंबईने दिलेल्या १५८ धावांच्या माफक आव्हानाच पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे शून्यावर बाद झाला. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने सामन्याचे चित्र बदलले. अजिंक्य याने वानखेडे मैदानावर चोहोबाजूने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांचा पाऊस पडाला. अजिंक्य फलंदाजी करताना भन्नाट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडही बघ्याच्या भूमिकेत होता. अजिंक्य रहाणेने २७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. ऋतुराजसोबत त्याने ८२ धावांची भागिदारी केली, यामध्ये अजिंक्य रहाणेचा वाटा ६१ धावांचा होता.



ऋतुराजची नाबाद खेळी...


ऋतुराज गायकवाड याने सयंमी फलंदाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड याने ३५ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. ऋतुराज याने सुरुवातीपासूनच एक बाजू लावून धरत विजय मिळवून दिला. आधी अजिंक्य राहणेसोबत भागिदारी करत विजयाचा पाया रचला.



रोहित-ईशानची विस्फोटक सुरुवात


कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. ४ षटकात ३८ धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी ढासळली. रोहित शर्माने १३ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. तर ईशान किशन याने २१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल