चेन्नईचा सात विकेट्सने विजय

वानखेडेवर मुंबईचे गर्वहरण


मुंबई (प्रतिनिधी) : वानखेडे स्टेडियमच्या म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेट्स राखून पराभव करत वस्त्रहरण केले. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. मुंबईने दिलेले १५८ धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि ११ चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या १६ व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर मुंबईचा दुसरा पराभव होय.


मुंबईकर अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या मैदानावर झंझावाती फलंदाजी केली. अजिंक्यने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच अजिंक्यने दमदार कामगिरी केली. मुंबईने दिलेल्या १५८ धावांच्या माफक आव्हानाच पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे शून्यावर बाद झाला. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने सामन्याचे चित्र बदलले. अजिंक्य याने वानखेडे मैदानावर चोहोबाजूने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांचा पाऊस पडाला. अजिंक्य फलंदाजी करताना भन्नाट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडही बघ्याच्या भूमिकेत होता. अजिंक्य रहाणेने २७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. ऋतुराजसोबत त्याने ८२ धावांची भागिदारी केली, यामध्ये अजिंक्य रहाणेचा वाटा ६१ धावांचा होता.



ऋतुराजची नाबाद खेळी...


ऋतुराज गायकवाड याने सयंमी फलंदाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड याने ३५ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. ऋतुराज याने सुरुवातीपासूनच एक बाजू लावून धरत विजय मिळवून दिला. आधी अजिंक्य राहणेसोबत भागिदारी करत विजयाचा पाया रचला.



रोहित-ईशानची विस्फोटक सुरुवात


कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. ४ षटकात ३८ धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी ढासळली. रोहित शर्माने १३ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. तर ईशान किशन याने २१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले.

Comments
Add Comment

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस

T20 World Cup 2026 : T२० विश्वचषक २०२६ चा बिगुल वाजला! १९ देशांचे अंतिम संघ जाहीर; पाहा सर्व संघांची संपूर्ण यादी

दुबई : आगामी ICC पुरुष T२० विश्वचषक २०२६ साठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून सहभागी होणाऱ्या २० पैकी १९

T20 World Cup 2026: टी २० वर्ल्ड कपआधी भारताची 'A' टीम जाहीर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. ७ फेब्रुवारी पासून या स्पर्धेला