चेन्नईचा सात विकेट्सने विजय

  133

वानखेडेवर मुंबईचे गर्वहरण


मुंबई (प्रतिनिधी) : वानखेडे स्टेडियमच्या म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेट्स राखून पराभव करत वस्त्रहरण केले. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. मुंबईने दिलेले १५८ धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि ११ चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या १६ व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर मुंबईचा दुसरा पराभव होय.


मुंबईकर अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या मैदानावर झंझावाती फलंदाजी केली. अजिंक्यने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच अजिंक्यने दमदार कामगिरी केली. मुंबईने दिलेल्या १५८ धावांच्या माफक आव्हानाच पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे शून्यावर बाद झाला. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने सामन्याचे चित्र बदलले. अजिंक्य याने वानखेडे मैदानावर चोहोबाजूने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांचा पाऊस पडाला. अजिंक्य फलंदाजी करताना भन्नाट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडही बघ्याच्या भूमिकेत होता. अजिंक्य रहाणेने २७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. ऋतुराजसोबत त्याने ८२ धावांची भागिदारी केली, यामध्ये अजिंक्य रहाणेचा वाटा ६१ धावांचा होता.



ऋतुराजची नाबाद खेळी...


ऋतुराज गायकवाड याने सयंमी फलंदाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड याने ३५ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. ऋतुराज याने सुरुवातीपासूनच एक बाजू लावून धरत विजय मिळवून दिला. आधी अजिंक्य राहणेसोबत भागिदारी करत विजयाचा पाया रचला.



रोहित-ईशानची विस्फोटक सुरुवात


कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. ४ षटकात ३८ धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी ढासळली. रोहित शर्माने १३ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. तर ईशान किशन याने २१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला