देणे मराठी शाळेचे

Share
  • मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? हा विषय या सदरांतून विविध संदर्भात चर्चिला गेला आहे. माझ्या एका तरुण प्राध्यापक सहकाऱ्याचे मला याबाबत विशेष कौतुक वाटले. आपल्या दोन्ही मुलींकरता त्याने मराठी माध्यम निवडले. खरे तर तुम्ही मुलांना कोणत्या माध्यमात घातले आहे किंवा पालक म्हणून काय ठरवताय, हा प्रश्न विचारणे मी केव्हाच सोडून दिले आहे. सरसकट इंग्रजी माध्यमाकडे झुकणारा मराठी भाषक पालकांचा कल हा मुद्दा माझ्यासारख्या मराठीकरता आग्रही असणाऱ्या कार्यकर्तीला वैफल्य आणणारा आहे.

पण अमोल भोसले या अगदी तरुण प्राध्यापकाने आपल्या मुलींकरता मराठी माध्यम निवडणे हा मुद्दा मला या विषयाच्या पार्श्वभूमीवर विशेष वाटला. मी त्याला म्हटले, ‘अरे वा, तुला का वाटला हा निर्णय घ्यावासा? त्यावर तो म्हणाला, ‘मी मराठी माध्यमातूनच शिकलोय ना. मग तसंच मुलांना मराठीतून शिकवणे हे अगदी स्वाभाविकपणे घडले.’ कविता, चित्र, अभिनय या सर्व कला त्याच्या दोन्ही मुलींमध्ये सहज रुजल्या आहेत. निर्मितीशीलता, अभिव्यक्ती, सर्जनशीलता या गोष्टींची रुजवात मुलांमध्ये मातृभाषेतून सहज होते. तसेच इतरांना समजून घेण्याची संवेदनशीलता वाढते.

उच्च मध्यम वर्ग व मध्यम वर्गातील पालक अनेकदा असे म्हणू लागले आहेत की, मराठी शाळेत भाजीवाले नि रिक्षावाल्यांची मुले येऊ लागली आहेत, त्यामुळे आमच्या मुलांना आम्ही पाठवू शकत नाही. म्हणजे या अशा भिंती आपणच आपल्या मुलांमध्ये निर्माण करायच्या. मग समाज कसा प्रवाही राहणार? तळागाळातील माणसांना समजून घेण्याची क्षमता आपण मुलांमधून संपवून टाकायची, हे क्रूर आहे. श्रीमंत वर्गातील मुलांनी त्यांच्याच वर्गातील मुलांशी मैत्री करायची? ही कुठली सवय आपण मुलांना लावतोय.

समाजातील या अशा भिंतींमुळेच आपण अजून वर्गांना जखडून आहोत. माझी मुलगी जे. जे. स्कूलमध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करत असताना मला म्हणाली, ‘आई, तू मला मराठी शाळेत शिकवलेस हे किती छान केलेस. गावागावांतून चित्रकलेचा अभ्यास करण्याकरता आलेली मुले त्यांचे प्रश्न, अडचणी सहज सांगतात नि त्या सोडवण्याकरता काय करायचं, हे आम्ही मिळून ठरवतो. तसंच परदेशातली नि परराज्यातील मुले देखील आमच्याकडे आहेत, त्यांच्याशी देखील संवादाचा आत्मविश्वास माझ्यात आहेच. मराठी शाळा मुलांना काय देते? याचे उत्तरच मला तिच्या उद्गारांतून मिळाले.

मराठी शाळा मुलांना समाजाशी जोडून ठेवते. माणसांचे चेहरे वाचायला शिकवते. समाजाच्या प्रश्नांचा अर्थ उलगडायला मदत करते. आणि विश्वाच्या अवकाशात उभे राहण्याचे सामर्थ्यही देते. हे केवळ भावनिक मनोगत नव्हे, मराठी शाळेत शिकलेल्या हजारो मुलांनी हे सिद्ध केले आहे. पण हे मायभाषेचे देणे समजून घ्यायला आपल्याला वेळ आहे का?

Recent Posts

Indus Waters Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिलेला सिंधू पाणी करार काय आहे?

सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…

7 minutes ago

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि आता… पाकिस्तानला धडकी!

पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…

15 minutes ago

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…

24 minutes ago

Saifullah Khalid : पहेलगाम हल्ल्यामागील मास्टरमाइंड सैफुल्लाह खालीद नक्की कोण आहे?

जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…

26 minutes ago

Pahalgam Attack Impact: पहलगाम हल्ल्याचा असाही फटका! माता वैष्णवदेवीच्या भाविकांची संख्या घटली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…

26 minutes ago

Pahalgam Terror Attack : पुन्हा एकदा दहशतीचा अंधार!

काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…

36 minutes ago