बिल्डरच्या चुकीची सगळ्या ठाणे-मुंबईकरांना शिक्षा; नक्की काय झाले?

एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे आले निदर्शनास, मुंबई महापालिकेने ठोठावला ७५ कोटींचा दंड


मुंबई : मुंबई महापालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडल्याने मुंबईकरांवर महिनाभर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. एका बिल्डरच्या चुकीमुळे ही घटना घडली असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल पालिकेने घेतली असून पाच महिन्यांत नासाडी झालेल्या पाण्याची रक्कम आणि दंड असे ७५ कोटी रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावे, असे पत्र पालिकेने ‘एमआयडीसी’ला पाठवल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.


वागळे इस्टेट या ठिकाणी बोअरवेल खोदत असताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे. तब्बल ५ महीने पाणी वाया गेले. या प्रकरणी एका नागरिकाने बांधकाम व्यावसायिकाविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या व्यावसायिकाची चूक मुंबईकरांना मात्र महागात पडली आहे.


भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांब जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्याला ठाणे येथे बोअरवेल खोदकामादरम्यान भगदाड पडले होते.


या जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी मुंबईत तब्बल १ महिना १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.


दरम्यान, ही घटना का घडली याचा तपास करत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदत असताना बिल्डरला या पाइपलाइनचा अंदाज आला नाही. यामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या १८ मीटर व्यासाच्या जलबोगद्याला मोठे भगदाड पडले. यामुळे लाखो लिटर पाणी यादरम्यान वाया गेले. हा प्रकार येथील एका नागरिकाला समजल्यावर त्याने बिल्डर विरोधात तक्रार दिली.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील