नोकरीची संधी! सीआरपीएफमध्ये मेगा भरती!

तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची पदे भरणार


नवी दिल्ली : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारी रिक्त जागा भरण्याचे आदेश सरकारने अनेक विभागांना दिले आहेत. त्यानुसार सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या तब्बल १ लाख ३० हजार जागा भरण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण १ लाख २९ हजार ९२९ पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि ४ हजार ४६७ पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, १० टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.





या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माजी लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत समतुल्य आर्मी पात्रता असणे आवश्यक आहे.


उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


प्रोबेशन कालावधी हा दोन वर्षांचा आहे. २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० अशी या पदाची वेतनश्रेणी आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत नोटीसमध्ये जाहीर करण्यात आली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय