नोकरीची संधी! सीआरपीएफमध्ये मेगा भरती!

तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची पदे भरणार


नवी दिल्ली : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारी रिक्त जागा भरण्याचे आदेश सरकारने अनेक विभागांना दिले आहेत. त्यानुसार सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या तब्बल १ लाख ३० हजार जागा भरण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण १ लाख २९ हजार ९२९ पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि ४ हजार ४६७ पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, १० टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.





या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माजी लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत समतुल्य आर्मी पात्रता असणे आवश्यक आहे.


उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


प्रोबेशन कालावधी हा दोन वर्षांचा आहे. २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० अशी या पदाची वेतनश्रेणी आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत नोटीसमध्ये जाहीर करण्यात आली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात