नागपूरात कलम १४४ जारी तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विशेष सुचना

  206

नवी दिल्ली: देशभरात रामनवमीला घडलेल्या हिसांचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंतीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना निर्देश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रात नागपूरमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ जारी करण्यात आलं आहे. आज मध्यरात्रीपासून पुढच्या २४ तासांसाठी ही आचारसंहिता लागू असेल. या काळात शहरातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. तसेच अनोळखी व्यक्तीला आधार कार्ड शिवाय हॉटेल रूम देण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. राज्यातील वाढते धार्मिक तेढ बघता नागपूर पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.


गुरुवारी साजरी होणार्‍या हनुमान जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक सूचना जारी केली आहे. सर्व राज्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, सण शांततेत पाळणे आणि समाजातील सांप्रदायिक सलोखा बिघडवणार्‍या घटकांवर लक्ष ठेवण्याचं काम करावं असं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. सामाजिक शांतता भंग करणारा कोणताही प्रकार घडल्यास आयोजकांना जबाबदार धरण्याच्या सूचनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.





बुधवारी दिल्ली पोलिसांनी हनुमान जयंतीपूर्वी जहांगीरपुरी भागात फ्लॅग मार्च काढला. पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि अन्य एका गटाला परिसरात मिरवणूक काढण्याची परवानगी नाकारली आहे. गेल्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी या भागात जातीय संघर्ष झाला होता, त्यात आठ पोलिस आणि एक स्थानिक रहिवासी जखमी झाले होते.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार