देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सज्जड दम; आम्ही तोंड उघडलं तर...

जीभ घसरलेल्या उद्धव ठाकरेंनी संयमाने बोलावे


मुंबई : अडीच वर्षांमधील त्यांचा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतूस कोण, हे जनतेला आणि तमाम महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.


रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार ठाण्यात जाऊन रोशनीची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा, असे ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमाने बोलावे, असे सुनावले आहे


फडणवीस म्हणाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून फेसबूकवरून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. मला तुमच्यापेक्षा खालच्या भाषेत बोलता येते कारण मी नागपूरचा आहे. पण मी तसे बोलणार नाही. हा त्यांचा थयथयाट आहे, याला उत्तर देण्याचे कारण नाही.


विरोधक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावं राजा योग्य आहे. मी गृहमंत्री पद सोडण्याची वाट बघत आहेत. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि