शालिनी ठाकरे यांची सुषमा अंधारेंवर खोचक टिका, देवाची टिंगल करणारे.....

  584

मुंबई: वारकरी संप्रदायाबाबत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत भडकाऊ विधाने करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधांरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी चांगलंच कैचीत पकडलंय. सुषमा अंधांरेंचा 'तो' फोटो ट्वीट करत त्यांनी अंधारेबाईंचा चेहरा सर्वांसमोर उघड केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव ठाकरे गटात गेलेल्या सुषमा अंधारे अनेकदा सत्ताधाऱ्यांवर इतर पक्षांतील नेत्यांवर जळजळीत टीका करत असतात. याआधी त्यांनी हिंदूंवर निशाणा साधत देवाबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. पण सुषमा अंधारे सध्या स्वत:च देव पुजेला लागल्या आहेत. शालिनी ठाकरे यांनी त्यांचा देवपूजा फोटो ट्वीट करत त्यांच्यावर खोचक टिका केली आहे.


शालिनी ठाकरे म्हणाल्या, ''रामनवमी जोरात साजरी करा असं राजसाहेबांनी सांगितले आणि हिंदू देव देवतांची टिंगल करणारे पण आरती करू लागले.
बाई सुधारली... ''





शालिनीताई ठाकरे यांच्या ट्वीटनंतर समाजमाध्यमांवर चर्चेला एकच उधाण आले असून अनेकांनी याला सुषमा अंधारे या क्रुर महिला असून केवळ मतांच्या राजकारणासाठी असे करत असल्याचे म्हटले आहे. या ट्वीटवरुन, 'करुन करुन भागले आणि देव पुजेला लागले' या म्हणीचा प्रत्यय येत असल्याचीही चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.