शालिनी ठाकरे यांची सुषमा अंधारेंवर खोचक टिका, देवाची टिंगल करणारे.....

मुंबई: वारकरी संप्रदायाबाबत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत भडकाऊ विधाने करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधांरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी चांगलंच कैचीत पकडलंय. सुषमा अंधांरेंचा 'तो' फोटो ट्वीट करत त्यांनी अंधारेबाईंचा चेहरा सर्वांसमोर उघड केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव ठाकरे गटात गेलेल्या सुषमा अंधारे अनेकदा सत्ताधाऱ्यांवर इतर पक्षांतील नेत्यांवर जळजळीत टीका करत असतात. याआधी त्यांनी हिंदूंवर निशाणा साधत देवाबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. पण सुषमा अंधारे सध्या स्वत:च देव पुजेला लागल्या आहेत. शालिनी ठाकरे यांनी त्यांचा देवपूजा फोटो ट्वीट करत त्यांच्यावर खोचक टिका केली आहे.


शालिनी ठाकरे म्हणाल्या, ''रामनवमी जोरात साजरी करा असं राजसाहेबांनी सांगितले आणि हिंदू देव देवतांची टिंगल करणारे पण आरती करू लागले.
बाई सुधारली... ''





शालिनीताई ठाकरे यांच्या ट्वीटनंतर समाजमाध्यमांवर चर्चेला एकच उधाण आले असून अनेकांनी याला सुषमा अंधारे या क्रुर महिला असून केवळ मतांच्या राजकारणासाठी असे करत असल्याचे म्हटले आहे. या ट्वीटवरुन, 'करुन करुन भागले आणि देव पुजेला लागले' या म्हणीचा प्रत्यय येत असल्याचीही चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक