शालिनी ठाकरे यांची सुषमा अंधारेंवर खोचक टिका, देवाची टिंगल करणारे.....

  590

मुंबई: वारकरी संप्रदायाबाबत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत भडकाऊ विधाने करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधांरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी चांगलंच कैचीत पकडलंय. सुषमा अंधांरेंचा 'तो' फोटो ट्वीट करत त्यांनी अंधारेबाईंचा चेहरा सर्वांसमोर उघड केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव ठाकरे गटात गेलेल्या सुषमा अंधारे अनेकदा सत्ताधाऱ्यांवर इतर पक्षांतील नेत्यांवर जळजळीत टीका करत असतात. याआधी त्यांनी हिंदूंवर निशाणा साधत देवाबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. पण सुषमा अंधारे सध्या स्वत:च देव पुजेला लागल्या आहेत. शालिनी ठाकरे यांनी त्यांचा देवपूजा फोटो ट्वीट करत त्यांच्यावर खोचक टिका केली आहे.


शालिनी ठाकरे म्हणाल्या, ''रामनवमी जोरात साजरी करा असं राजसाहेबांनी सांगितले आणि हिंदू देव देवतांची टिंगल करणारे पण आरती करू लागले.
बाई सुधारली... ''





शालिनीताई ठाकरे यांच्या ट्वीटनंतर समाजमाध्यमांवर चर्चेला एकच उधाण आले असून अनेकांनी याला सुषमा अंधारे या क्रुर महिला असून केवळ मतांच्या राजकारणासाठी असे करत असल्याचे म्हटले आहे. या ट्वीटवरुन, 'करुन करुन भागले आणि देव पुजेला लागले' या म्हणीचा प्रत्यय येत असल्याचीही चर्चा रंगली आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही