Categories: रायगड

पेण, अलिबागला पाणीटंचाईच्या झळा

Share

पेण तालुक्यातील दहा हजार नागरिक पिताहेत टँकरचे पाणी

  • सुभाष म्हात्रे

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण आणि अलिबाग तालुक्यातील नागरिकांना सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. पाणी योजनांकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष आणि स्थानिक प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे पेणमधील ९ गावे आणि ३० वाड्यांमधील दहा हजार ५५८ नागरिकांना १४ टँकरने पिण्यासाठी पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून, या पाण्याच्या प्रश्नांतून आमची कधी सुटका होणार असा सवाल स्थानिक विचारत आहेत. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे, सारळ, रेवस या गावांमध्येही तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. परंतु तेथे अद्याप टँकर सुरू केलेले नाहीत.

पेणच्या खारेपाट विभागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जवळपास आठ वर्षांपासून ही योजना रखडली आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील तुकाराम वाडी, मसद बुद्रुक, मसद बेडे, बोर्वे, निफाड वाडी, खरबाची वाडी, शिर्की या गावांमधील महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. तापमान वाढल्यास पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारणपणे ५५० गावे आणि एक हजार वाड्यांना दरवर्षी पाणीटंचाई जाणवत असते. रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या १ हजार ४४४ योजनांमुळे ही पाणीटंचाई कमी होईल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाचा आहे. यासाठी तब्बल ९३८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र त्याचा काहीच परिणाम दिसून येत नसल्याने दरवर्षी उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. जिल्ह्यात प्रथम पेण तालुक्यात पाणीटंचाई सुरू होते. ही टंचाई दूर करण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा योजना अपूर्णच

शहापाडा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी शिर्की चाळ- १, शिर्कीचाळ – २, निफाड ठाकूर वाडी, खरबाची वाडी, कांडणे आदिवासी वाडी, जानवली बेडी, खबसा वाडी, आंबिवली, निगडे आदिवासी वाडी, शेडाची ठाकूर वाडी या गावांना मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनेंतर्गत एक कोटी ३६ लाखांची योजना जलजीवनमधून सुरू करण्यात येत आहे. गेल्या वर्षी २५ एप्रिलला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या योजनेचे काम अद्याप अपूर्णच आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही नियोजना अभावी पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. जिल्ह्यात नव्याने कोणतीच धरणे बांधण्यात आलेली नाहीत. तसेच अस्तित्वात असणाऱ्या तलाव, नद्यांमधील गाळही काढलेला नाही. सरकार आणि जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सध्या टंचाई जाणवू लागलेल्या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हेटवणे धरणातून शहापाडा धरणात हे पाणी आणले जाते. तेथून पेणच्या खारेपाट विभागात पाणीपुरवठा केला जातो. परंतु शहापाडा धरणात पाणी कमी येत असल्याने खारेपाटात दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत येथे मीनाताई ठाकरे योजनेतून टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये साठवण टाक्या देण्यात येत आहेत. यातून पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते. – जय वेंगुर्लेकर (कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)

खारेपाटातील पाणीटंचाईपेक्षा आताची परिस्थिती समाधानकारक आहे. हेटवणे धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी २० तास पंप सुरू आहेत. परंतु ज्या गावांमध्ये पाईपलाईनच टाकलेली नाही, अशा गावांना, वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. जलजीवन मिशनमधून शिर्कीचाळ येथे पाईपलाईन टाकली जात असून, येत्या काही दिवसांत तेथे सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल. – एकनाथ कोठेकर (उपअभियंता, अलिबाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण)

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

54 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago