धोका वाढला! देशात आणि राज्यात कोविड रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ

  386

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनूसार देशात कोविड-19 प्रकरणांची वाढ झाली असून गेल्या २४ तासांत देशात ३ हजार ०९५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार २०८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५ मृत्यू झाले असून त्यापैकी गोवा आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक आणि केरळ मधले तीन जण आहेत.


महाराष्ट्रात कोविडचे ६९४ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण संख्या आता ३ हजार ०१६ इतकी झाली आहे. तसेच राज्यात ३० दिवसांत सक्रिय कोविड प्रकरणांमध्ये १५ पट वाढ झाली असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये गेल्या चार आठवड्यांत कोविड प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील ५३ टक्के कोविड प्रकरणे पुणे आणि मुंबईत आहेत. परंतु, ओमायक्रॉनचा सबवेरियंट XBB.1.16 ची प्रकरणे औरंगाबाद, गोंदिया आणि अकोला यांसारख्या जिल्ह्यांमध्ये वाढली असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या माहितीत समोर आले.




Comments
Add Comment

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या