वादळी वाऱ्यात लासलगाव येथील द्राक्ष बाग भुईसपाट

  507

हातातोंडाशी आलेला घास वादळीवाऱ्यात उडाला



  • प्रिया बैरागी


निफाड : अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये लासलगाव येथे दीड एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाले आहे.


लासलगाव कोटमगाव रोड लासलगाव बाजार समिती जवळ येथील शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकर द्राक्ष बाग भुई सपाट झाली. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरायचे कसे? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे.


लासलगाव येथील शेतकरी प्रल्हाद पाटील यांच्या एस.एस.एन व्हरायटीचा द्राक्ष बाग हार्वेस्टिंगच्या टप्प्यात असतानाच वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडल्याने जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच द्राक्ष बागेची व्यापाऱ्याकडून पाहणी करण्यात आली होती. या द्राक्षांना ५० ते ५५ रुपये दर मिळाला असता. ही द्राक्ष रसिया येथे एक्सपोर्ट करण्यात येणार होती. परंतु वादळी वाऱ्यामुळे होत्याचे नव्हते झाले आणि संपूर्ण द्राक्ष बाग जमीनदोस्त झाल्याने पूर्ण द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता हे व्यापारी द्राक्ष बाग पाहून परत जात आहेत.


शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पोटच्या पोराप्रमाणे द्राक्ष बाग वाढवली असतानाच अस्मानी संकटांनी घाला घातला. यात संपूर्णत: द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाल्याने प्रल्हाद पाटील यांचे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेची नुकसान झाले आहे. हे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी