राज्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात येत्या दोन दिवसात विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.


मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा ११ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा ११ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.


राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी कडाक्याचे ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अवकाळी पाऊस कोसळत असल्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम होत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अति भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे. मात्र, सावधानता बाळगावी, असे आवाहन खुळे यांनी केले आहे.


दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात वाढलेल्या तापामानत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला