राज्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात येत्या दोन दिवसात विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.


मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा ११ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा ११ जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.


राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी कडाक्याचे ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी अवकाळी पाऊस कोसळत असल्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम होत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अति भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे. मात्र, सावधानता बाळगावी, असे आवाहन खुळे यांनी केले आहे.


दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत स्वच्छ कोरडे वातावरण असण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात वाढलेल्या तापामानत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात

Govind Barge Death : माजी उपसरपंच बर्गे मृत्यू प्रकरणात मोठी बातमी, नर्तिका पूजा गायकवाडच्या अडचणी वाढल्या; यंदाची दिवाळीही...

बीड : बीडमधील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच

Chandshaili Ghat Accident : नंदुरबारच्या चांदशैली घाटात भीषण अपघात; भाविकांची पीकअप जीप दरीत कोसळून ६ ठार, १५ हून अधिक गंभीर जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. भगवान अस्तंबा ऋषी यांच्या

ट्रेनच्या AC कोचमध्ये प्रवाशांसाठी नवी सुविधा, मळक्या ब्लँकेट्सचा त्रास संपला.

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या स्वछता आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेच्या बेडरोलमध्ये

ऐन दिवाळीत पाऊस पडणार! हवामान खात्याचा अंदाज

मुंबई: राज्यात सध्या उन्हाचा कडाक आणि ढगाळ वातावरण असे मिश्र हवामान अनुभवयाला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस

राज्यातील १४३ बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले

पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील आर्थिक अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांवर सर्वसमावेशक निर्बंध (ऑल