राज्यात मनसुख हिरेन, सुशांत सिंग प्रकरणाची पुनरावृत्ती

  626

"जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे, खून झालाय"


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून खून आहे, असा आरोप आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.





जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक आणि मुंबई राखीव पोलीस दलातील कर्मचारी वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. मात्र ही हत्या असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदमचा मृतदेह सापडल्याने कंबोज यांनी शंका व्यक्त केली आहे.


कदम हा जितेंद्र आव्हाडांचा सुरक्षारक्षक होता. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातल्या आरोपीचा असा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण झालेय, असा आरोप कंबोज यांनी केला आहे.


माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, वैभव कदम प्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवावा, आमचे रक्षण करणारे पोलीस सुरक्षित नाहीत किंवा त्यांना न्याय मिळणार नसेल तर जनतेचे काय? असा सवालही कंबोज यांनी केला आहे.


या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्याची मागणी कंबोज यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Gold Loan News: सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आता सोने तारण कर्ज अधिक मिळणार आरबीआयच्या 'या ' निर्णयानंतर कर्जदारांची दिवाळी

प्रतिनिधी: सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. छोट्या छोट्या लघू कर्जदारासाठी आरबीआयने सरलतेचे दरवाजे

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार मुंबई : दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या

आता मुंबईत किनारा मार्गावर मिळणार थांबा

पालिकेकडून 'या' चार जागांची निवड मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंतच्या मुंबई सागरी

दादर केळुस्कर मार्गाच्या काँक्रिटीकरणाची कामे रद्द

मनसे, रहिवाशांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचा निर्णय मुंबई (खास प्रतिनिधी): दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान