नारायण राणेंच्या शिवसेना सोडण्यामागे कोणाचा हात?

  199

राज ठाकरेंनी बिंगच फोडलं


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडवा सभेची तोफ धडाडलीच. यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी शिवसेना सोडून जावी यासाठी कटकारस्थान करणाऱ्याचं बिंग फोडलं. नारायण राणे त्यावेळी शिवसेना सोडून जाणार नव्हते. पण, त्यावेळी नेमकं काय घडलं? हे जाहीरपणे सांगत एकाप्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.


राज ठाकरे म्हणाले “नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी त्यांना म्हणालो, मी साहेबांशी बोलतो जाऊ नका. ते मला बोलले, बोला तुम्ही साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन केला. म्हटलं, त्यांची इच्छा नाहीय. जाऊ देऊ नका. बाळासाहेब मला म्हणाले, त्यांना लगेच घरी घेऊन ये. मी नारायणरावांना फोन केला. लगेच या आपल्याला साहेबांकडे जायचंय. ते तिकडून निघाले आणि मला बाळासाहेबांचा फोन आला. अरे नको बोलवूस.”, असं सांगत राज ठाकरे यांनी पुढचा किस्सा सांगितला.


“फोनवर बोलताना मला मागून आवाज येत होता. नाईलाजास्तव मला नारायणरावांना सांगावं लागलं की, येऊ नका. ज्याप्रकारे लोकांना बाहेर काढण्याचं राजकारण चालू होतं त्याचा शेवट हा होता. त्यांचं राजकारण त्यांनाच लख लाभ.”, असं राज ठाकरे म्हणाले.

Comments
Add Comment

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात

बीड ते परळी रेल्वे मार्गाबाबत झाला हा निर्णय

मुंबई : रेल्वेमार्गापासून दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

आंदोलन तर संपले, पण लाखोंच्या संख्येत मुंबईत आलेल्या भाकरी-चटणीचे काय? उरलेले अन्न आणि साहित्य गरजूंना केले दान

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता.