अवकाळी पावसाचा मंत्री, आमदारांना फटका

Share

मुंबई : आज सकाळी मुंबईत जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्याचा परिणाम विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावरही झाला. अनेक आमदार, मंत्र्यांना पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे विधानसभेत अर्धा तास चर्चा पुढे ढकलत त्याजागी लक्षवेधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून विधानसभेचे कामकाज सुरू होणार होते. मात्र, मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अनेक आमदार, मंत्री वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे विधानसभेचे तालिका अध्यक्ष सुनील भुसारा यांनी अर्धा तास चर्चा पुढे ढकलून त्याजागी लक्षवेधी सुरू करत असल्याचे सांगितले.

महागाईवरुन विरोधकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटच्या आठवडा सुरू आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. उद्या गुढीपाडवा आहे. त्यापार्श्वभूमीवर आज हातात गुढी घेऊन विरोधकांनी अनोखे आंदोलन केले. ‘उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी; सरकार गुढी घरी उभारू की शेजारी?’, ‘वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सांगा कशी करू खरेदी? कशी उभारू गुढी?’, असे फलक दाखवत विरोधकांनी घोषणाबाजी केली. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजीही विरोधकांनी केली.

चाकरमान्यांचीही उडाली तारांबळ

मुंबईसह उपनगरात सकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरही परिणाम झाला. अवकाळी पावसामुळे उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक सकाळी काही वेळासाठी विस्कळीत झाले होते. यामुळे कार्यालयात निघालेल्या चाकरमान्यांचीही तारांबळ उडाली.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

15 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

2 hours ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

3 hours ago