ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी आज वयाच्या ८८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानी त्यांची सकाळी सहा वाजता निधन झाले.


भालचंद्र यांनी असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


भालचंद्र यांनी आजवर ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून लांब होते. याकाळात भालचंद्र हे कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील एका प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत होते.


‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या १९८४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणे खूप लोकप्रिय आहे. आजही नवरात्रीत हे गाणे नक्कीच ऐकायला मिळते.


भालचंद्र यांनी फक्त मराठी नाही तर कोल्हापुरात प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. भालचंद्र यांची खूप साधी राहणी होती. भालचंद्र यांनी सगळ्या चित्रपटांमध्ये प्रत्येक भूमिका ही परफेक्ट असली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करायचे. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काही वर्षे सचिव तर अनेक वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता.


भालचंद्र यांनी मर्दानी (१९८३), मासूम (१९९६), झुंज तुझी माझी (१९९२), हळद रुसली कुंकू हसलं (१९९१), माहेरची साडी (१९९१) या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.


Comments
Add Comment

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे

Pune Traffic : रस्तेबंदीच्या फलकांमुळे पुणेकर चक्रावले! सायकल स्पर्धेसाठी ९ ते ६ रस्ते बंद की टप्प्याटप्प्याने? पाहा नेमके बदल काय?

पुणे : पुणे शहरात आज, शुक्रवारी (२३ जानेवारी) 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा

Thane-CSMT : ठाणे ते सीएसएमटी प्रवास सुसाट! १५० कोटींच्या नव्या समांतर पुलामुळे 'शीव'ची कोंडी फुटणार; मार्ग कसा असेल?

मुंबई : मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि वाहतूककोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शीव (Sion) परिसरातील प्रवाशांसाठी एक