तु बीसीसीआयचा अध्यक्ष होशील का? सचिनने दिलं मजेशीर उत्तर

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत महत्वाचं विधान केलं आहे. नवी दिल्लीत इंडिया टुडे कॉन्क्लेव २०२३ या सोहळ्यातील 'सचिनिझम अँड आयडिया ऑफ इंडिया' विशेष कार्यक्रमात सचिन तेंडुलकर बोलत होता.


सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि याआधीचे अध्यक्ष देखील माजी क्रिकेटपटू होते. मग भविष्यात तूही बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पाहायला मिळणार आहेस का? असं सचिनला विचारण्यात आलं असता त्यानं अगदी मजेशीर उत्तर दिलं.


"मी वेगवान गोलंदाजी करत नाही", असं सचिन म्हणाला. (रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली मध्यम गतीनं गोलंदाजी करायचे) एका दौऱ्यात जेव्हा गांगुलीनं विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा तो 140kmph गतीनं गोलंदाजी करण्याचं सांगत होता. पण त्यानंतर त्याची कंबर दुखायला लागली होती, असं म्हणत सचिननं मी १४० च्या गतीनं गोलंदाजी करू शकत नाही असं मिश्किलपणे म्हटलं आणि बीसीसीआय अध्यक्षपदाच्या प्रश्नाला टाळलं.


सचिननं यावेळी हरभजन सिंग बाबत एक मजेशीर किस्साही सांगितला. सचिन म्हणाला, "मी जेव्हा पहिल्यांदाच मोहालीत हरभजनला पाहिलं होतं तेव्हा मला एकानं सांगितलं की भज्जी दुसरा खूप चांगला टाकतो. ही ९० च्या दशकातील गोष्ट आहे. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर तो रनअपसाठी न जाता थेट माझ्याकडे यायचा. जेव्हा तो नंतर टीममध्ये आला तेव्हा मी त्याला विचारलं. तेव्हा मला कळालं की मी प्रत्येक बॉल खेळल्यानंतर हेल्मेट नीट करण्यासाठी डोकं हलवायचो तर हरभजनला वाटायचं की मी त्याला बोलावतोय. त्यामुळे तो प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर माझ्याजवळ यायचा". सचिनने हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने