शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही


मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा आज सकाळी विधानसभेत उपस्थित केला, त्यावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.


अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात काल नांदेड आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार आज अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्याचे काम सुरु आहे तर नाशिक जिल्ह्यात देखील नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत

चंद्रपुरातील शेतकऱ्याची किडनी विकणाऱ्या डॉक्टरला अटक

चंद्रपूर : कर्जबाजारी शेतकऱ्याची किडनी विकल्याच्या गाजलेल्या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

लाडकी काव्या म्हणजेच ज्ञानदाची लगीनघाई सुरु; हातावर रंगली त्याच्या नावाची मेहंदी

मुंबई : लग्नाचा हंगाम जोरदार सुरु आहे. बरेच सेलिब्रिटी मंडळी या वर्षी विवाह बंधनात अडकली तर काही लवकरच लग्न करणार

पॅन-इंडिया सुपरस्टार प्रभास यांनी ‘द स्क्रिप्ट क्राफ्ट इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’द्वारे जागतिक स्टोरीटेलिंगला दिले नवे व्यासपीठ!

बाहुबली, सालार आणि कल्कि 2898 ए.डी. सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे आणि ज्यांना अनेकदा जगातील महान

रोजगार निर्मितीतच नव्हे तर नव्या अर्जदारांसह महिला अर्जदारांची संख्या तुफान वाढली- अहवाल

मुंबई: एक प्रसिद्ध झालेल्या अहवालातील माहितीनुसार, सेवेवर आधारित नोकरभरतीचा विस्तार झाल्याने तसेच महिलांसह

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना