'ऑनलाईन रमी'मुळे ४२ जणांची आत्महत्या

  272

आणखी एक राज्यपाल वादग्रस्त ठरणार!


चेन्नई : 'ऑनलाईन रमी' या पत्त्यांच्या खेळापोटी तामिळनाडूमध्ये ४२ जणांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.


देशभरात सध्या 'ऑनलाईन रमी'च्या जाहिरातींचा भडीमार सुरु आहे. सोशल मीडियावर तर विविध सेलिब्रिटींकडूनच या जाहिराती केल्या जात आहेत. महाराष्ट्रातही या 'ऑनलाईन रमी'च्या जाहिरातींनी ऊत आणला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले महिला आणि पुरुष कलाकार या जुगाराच्या खेळाच्या जाहिराती करत आहेत. या जाहिरातींमधून ते लोकांना जुगार खेळण्यास प्रोत्साहित करत असल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला आहे. यावर टीकाही होत आहे.





तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये याबाबत थानथाई पेरियार द्रविडर काझगम (टीपीडीके) या सामाजिक आणि राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तामिळनाडूत 'ऑनलाईन गेम्स' आणि 'ऑनलाईन' जुगारावर प्रतिबंधक विधेयक राज्यपालांनी परत पाठवल्याने हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.


ऑनलाईन रमी या जुगाराच्या नादी लागल्याने राज्यात ४२ जणांनी आत्महत्या केल्याचा दावा या संघटनेने केला असून याला राज्यपालच जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आत्महत्या केलेल्या चार जणांच्या अस्थी आम्ही गोळा केल्या असून त्या पोस्टाद्वारे राजभवनावर पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती टीपीडीकेचे प्रमुख अनूर जगदीशन यांनी सांगितले.


जुगाराच्या खेळाच्या जाहिराती करणा-या कलाकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील