कोरोनानंतर आता इन्फ्लुएंझाचे तांडव?

इन्फ्लुएंझापासून बचावासाठी मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले  आवाहन


नवी दिल्ली : देशात व्हायरल फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इन्फ्लुएंझामुळे (H3N2 Influenza) रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचे आवाहन केले जात आहे. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी नागरिकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. रणदिप गुलेरिया यांनी इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा अबलंब करण्यास सांगितले आहे. यावेळी मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.


इन्फ्लुएंझा हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदलेला प्रकार आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितलं की, नागरिक कोविड उपायांचं पालन करु आणि लसीकरण करु शकतात. नागपूर येथे अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (एएमएस) तर्फे आयोजित परिषदेत डॉ.रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली आहे.


डॉ. गुलेरिया म्हणाले की, मास्क वापरण्याची गरज आहे, कोविडप्रमाणे पसरणारा संसर्ग आहे. हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे. मधुमेह तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.


डॉ. गुलेरिया म्हणाले की, दुसरा पर्याय म्हणजे उच्च जोखीम असणाऱ्या रुग्णांना वेगळं ठेवणं. वृद्ध आणि इतर आजारी लोकांना वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार आणि त्यांचं निरीक्षण करणे गरजेचं आहे. तसेच फ्लूवरील लस घेणं हा एक उपाय आहे. इन्फ्लूएंझा जॅब दरवर्षी नवीन लसीच्या स्वरुपात येतो आणि या लसीमध्ये इन्फ्लूएंझा ए आणि बी आणि त्यांचे उपप्रकार देखील समाविष्ट आहेत.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या