कोरोनानंतर आता इन्फ्लुएंझाचे तांडव?

इन्फ्लुएंझापासून बचावासाठी मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले  आवाहन


नवी दिल्ली : देशात व्हायरल फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. इन्फ्लुएंझामुळे (H3N2 Influenza) रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांकडून फ्लू वॅक्सिन घेण्याचे आवाहन केले जात आहे. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी नागरिकांना घाबरुन न जाता योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. रणदिप गुलेरिया यांनी इन्फ्लुएंझापासून बचाव करण्यासाठी कोविड उपायांचा अबलंब करण्यास सांगितले आहे. यावेळी मास्क, लस आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.


इन्फ्लुएंझा हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदलेला प्रकार आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितलं की, नागरिक कोविड उपायांचं पालन करु आणि लसीकरण करु शकतात. नागपूर येथे अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (एएमएस) तर्फे आयोजित परिषदेत डॉ.रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली आहे.


डॉ. गुलेरिया म्हणाले की, मास्क वापरण्याची गरज आहे, कोविडप्रमाणे पसरणारा संसर्ग आहे. हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे. मधुमेह तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे.


डॉ. गुलेरिया म्हणाले की, दुसरा पर्याय म्हणजे उच्च जोखीम असणाऱ्या रुग्णांना वेगळं ठेवणं. वृद्ध आणि इतर आजारी लोकांना वेगळं ठेवून त्यांच्यावर उपचार आणि त्यांचं निरीक्षण करणे गरजेचं आहे. तसेच फ्लूवरील लस घेणं हा एक उपाय आहे. इन्फ्लूएंझा जॅब दरवर्षी नवीन लसीच्या स्वरुपात येतो आणि या लसीमध्ये इन्फ्लूएंझा ए आणि बी आणि त्यांचे उपप्रकार देखील समाविष्ट आहेत.

Comments
Add Comment

मोदी सरकारचा मोठा 'मास्टरस्ट्रोक'! महाराष्ट्रासह चार राज्यात रेल्वे ट्रॅकची क्षमता वाढणार; २४,६३४ कोटी मंजूर!

'४१% रेल्वे वाहतूक' असलेल्या कॉरिडॉरला ४ ते ६ लेनमध्ये विस्तार; वाहतूक खर्च होणार कमी नवी दिल्ली : केंद्रीय

आजचा दिवस पीएम मोदींसाठी खास महत्वाचा! 'त्या' शपथविधीला २५ वर्षे पूर्ण

देशाला 'विकसित भारत' बनवण्याचा संकल्प; जुना फोटो केला शेअर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर २४

मिताली राज आणि रवी कल्पनाच्या नावांच्या स्टॅण्डचे अनावरण

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था): येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या

दिल्लीत गोळीबाराचा थरार, नेपाळच्या चोराचा दिल्लीत एन्काउंटर

नवी दिल्ली : नेपाळचा कुख्यात चोर भीम बहादुर जोरा दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर दक्षिण

भारताचा ‘ध्वनी’ ब्रह्मोसपेक्षाही महाभयंकर?

नवी दिल्ली : भारताने ब्रह्मोसपेक्षाही ‘महाभयंकर’ क्षेपणास्त्र तयार केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे नवे तळही थेट

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी