गेल्या ९ तासांपासून ईडीची घरावर छापेमारी, मात्र मुश्रीफ नॉट रिचेबल

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढतच आहेत. आज पहाटेपासूनच कोल्हापूरातील कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी सुरु आहे. तब्बल ९ तास ही कारवाई सुरु आहे. पण या गदारोळात हसन मुश्रीफ कुठे आहेत, याचं उत्तर मिळालेलं नाही.

ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कुटुंबियांकडून जबाब नोंदवून घेत आहेत. मात्र हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकत नाहीये. कागलमध्ये एवढा राडा सुरु असताना मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

गेल्या दीड महिन्यात सलग तिसऱ्यांदा ही छापेमारी झाली. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या ४० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा बँकेतल्या काही खात्यांचाही तपास करण्यात येत असून यासंदर्भात इडीने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान या छापेमारीमुळे सध्या एकच खळबळ उडाली असून, मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून मुश्रीफ यांच्या नावे घोषणा सुरू केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये