तुकाराम बीज निमित्त देहू नगरीत लाखो वारकऱ्यांची गर्दी

  100

कीर्तन, आरती, पालखी सोहळ्यात नागरिकांचा सहभाग


देहू नगरी (वार्ताहर) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजेच ३७५ व्या तुकाराम बीजच्या निमित्ताने गुरुवारी लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहू येथे दाखल झाले होते.


संत तुकाराम महाराजांनी ज्या स्थळावरून वैकुंठगमन केले, त्या स्थळावर नांदुरकी नावाचा वृक्ष आहे. तुकाराम बिजेला दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो, याची अनुभूती वारकरी आणि भाविकांना येते, असे सांगितले जाते. त्यामुळे या वृक्षाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वारकरी प्रामुख्याने शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. याच वातावरणात शेतकरी तुकोबारायांना साकडं घालणार आहे.


या सोहळ्याची कीर्तनाने सुरुवात, तुकोबारायांच्या पादुकांची आरती, तसेच काही अंतरावर असलेल्या तुकारामांच्या वैकुंठ गमन मंदिरात पालखी काढण्यात येणारी पालखी असा आयोजित कार्यक्रम पाहता या कार्यक्रमात नागरिक सहभागी होताना दिसून येतात. यावेळी दुपारी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर, वारकऱ्यांच्या समजुतीप्रमाणे नांदुरकी वृक्ष थरारला की तुकोबा सदेह वैकुंठ गमनास गेले असा त्याचा अर्थ होतो.


सोहळ्यासाठी मोठा बंदोबस्त
या सोहळ्यासाठी एक अप्पर पोलीस आयुक्त, एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, २५ सहायक पोलीस निरीक्षक, १३० पोलीस कर्मचारी, दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दोन शीघ्र कृतिदल असा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच बॉम्बशोधक पथक, श्वान पथक आणि साध्या वेशात ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.


वारकरी देहूत दाखल
या बीजोत्सवासाठी शेकडो वारकरी देहूत दाखल झाले. कोरोनामुळे दोन वर्ष हा सोहळा होऊ शकला नाही मात्र मागच्या वर्षी हा सोहळा दिमाखात पार पडला. यंदाही या देदीप्यमान सोहळ्यासाठी हजारो वारकरी देहूत दाखल झाले. यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यंदा झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. येणारे वर्ष नीट जाऊ दे, असे म्हणत तुकोबा चरणी शेतकरी विलीन होत, भजनांनी सगळा परिसर यावेळी दुमदुमला.


Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील