राज्यात धुळवड उत्साहात, भिवंडीत विशेष कार्यक्रम

  168

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात मुंबई, ठाणे, भिवंडी नाशिक, कोकणासह ठिकठिकाणी होळी रंगपंचमीचा सण अर्थात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कोरोनानंतर होळीची धूम सर्वत्रच धामधुमीत साजरी होताना रंगांचे आविष्कार, गाणी, त्यातच पावसाचे आगमनाने चिंब होत होळी, रंगपंचमीचा उत्साह लहानांपासून थोरांपर्यंत वाखाणण्याजोगा दिसून आला.


भिवंडी शहर व ग्रामीण भागात सोमवारी रात्री होळीनिमित्त ठिकठिकाणी होलिका दहन झाले. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एक गाव एक होळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच वडघर ग्राम पंचायतीच्या वतीने होळी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लहान मुलांनी या नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याचबरोबर नवीन लग्न झालेल्या गावातील मुली व जावयांचा सन्मान देखील या निमित्त वडघर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गावातील शेकडो नागरिक व महिलांनी हजेरी लावली होती.

मुंबईमध्ये जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात होळी साजरी करणाऱ्यांची संख्या पाहायला मिळाली. मुंबईसह उपनगरातून मोठ्या प्रमाणात तरुण अनेक कुटुंब जुहू चौपाटीला होळी साजरी करण्यासाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी धुळवड साजरी केली. सहकुटुंब आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी