आशियातल्या सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियमचे अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन

  147

डोंबिवली (वार्ताहर) : जगप्रसिद्ध झालेला खेळ कल्याण डोंबिवलीकरांना देखील खेळता यावा आणि येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये इथला खेळाडू असावा या उद्देशाने डावखर फाउंडेशन आणि रिजन्सी ग्रुप यांनी बेलग्रेव स्टेडियम सुरू केले आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट, चार पॅवेलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी रीजन्सी ग्रुपचे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रुपचंदाणी, दिनेश कुमार बासोरिया उपस्थित होते. तसेच माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर आणि माजी नगरसेवक सचिन पोटे देखील उपस्थित होते.


आजची जीवनशैली पाहता निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी पिकल बॉल हा खेळ आवर्जून खेळला जातो. उद्घाटनाच्या दिवशी डावखर कप २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंडमधून खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. डावखर कप २०२३ मधील विजेत्यांना रोख रक्कम आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. ओपन मेन्स सिंगलमध्ये अनुक्रमे कुलदीप महाजन, गौरव राणे, हिमांश मेहता, ओपन मेन्स डबलमध्ये अनुक्रमे तेजस मयूर, वंशिक रोनव, गौरव हिमांश आणि ३५ प्लस मेन्स डबलमध्ये अनुक्रमे मिहीर हिमांशू, वैभव विकी, संदीप शैलेश यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी राष्ट्रीय टेनिस खेळाडू ईशा लखानी आणि नॅशनल पिकल बॉल खेळाडू नैमी मेहता व हर्ष मेहता देखील उपस्थित होते. तसेच ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू हे देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते.


भारतात या खेळाची आवड निर्माण व्हावी त्यामुळे अल्पदरात प्रवेश असेल आणि सुरुवातीचे काही दिवस मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक वयोगटात खेळला जाणारा हा खेळ असून प्रत्येक वयोगटातील बेस्ट प्लेयरच्या युएस चॅम्पियनशिपचा पूर्ण खर्च डावखर फाउंडेशन उचलणार आहे अशी माहिती डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी दिली. एशियातल्या सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियम उद्घाटनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले.

Comments
Add Comment

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी