‘चला हवा येऊ द्या’ला सागर कारंडेचा रामराम

  180


  • ऐकलंत का!: दीपक परब


चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून विनोदवीर सागर कारंडेने एक्झिट घेतली असून श्रेया बुगडेने त्याची पोस्टमन काकांची जागा घेतली आहे. कोरोना महामारीच्या अति कठीण काळात रसिक-प्रेक्षकांची मने रिझविण्याचे मोठे काम ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी चोखपणे बजावले गेले.


याच निखळ विनोदी मालिकेमार्फत सागर कारंडे हे नाव घराघरांत पोहोचले. सागरने या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे फारच चांगल्या प्रकारे मनोरंजन केले. पण आता सागरने ‘चला हवा येऊ द्या’ या बहुचर्चित कार्यक्रमाला रामराम ठोकला आहे. या कार्यक्रमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तर कधी पोस्टमन काका बनून रडवलेही आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागर कारंडेने आपल्या भावनिक शैलीत सादर केले आहेत. त्यामुळे या हास्य मंचावर प्रेक्षकांचे डोळे आलावण्याचे काम सागरने बरेचदा केले आहे.


एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम सागर नेमकेपणाने बजावायचा. आता ‘चला हवा येऊ द्या’मधील त्या पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतली आहे. श्रेयाने त्यासाठी खास पोस्टमनचा वेष परिधान केला आहे. पण सागरने प्रेक्षकांच्या मनात ठसविलेल्या या पोस्टमन काकांची जागा श्रेया बुगडेने घेतल्याने सागरचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. सागर कारंडे मालिकेत वाचन करीत असलेले पत्र मनाला भिडायचे. पण श्रेयाच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही, असे मत व्यक्त होत आहे. सागर कारंडेने ‘चला हवा येऊ द्या’ का सोडलं?, श्रेयाच्या आवाजात सागरसारखा गंभीरपणा नाही, अशा कमेंट्स समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या जात आहेत. श्रेया बुगडे एक उत्तम अभिनेत्री असली तरी मनाला भिडणारे ते पोस्टमन काकांचे पत्र वाचण्यात ती कुठेतरी कमी पडत आहे. पण यापुढे ‘चला हवा येऊ द्या’मधील सर्वच विनोदवीर आता ‘पत्र वाचन’ करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.


सागर एक उत्कृष्ट अभिनेता आणि लेखक आहे. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला. त्याची आणि भारत गणेशपुरेची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून त्याने अनेक विनोदी भूमिका सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचे हृदयस्पर्शी पत्रवाचन प्रेक्षकांना खूपच भावले होते. सागरने छोटा पडदा गाजवण्यासोबत रूपेरी पडद्यावरदेखील काम केले आहे. जलसा, फक्त लढ म्हणा, बायोस्कोप, माय हिंदू फ्रेंड आणि एक तारा या सिनेमांत त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल