परिक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थी भारावले...

  104

कल्याण : सम्राट अशोक विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांच्यासह परीक्षा केंद्र संचालक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी, परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांचे शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ गुलाब पुष्प देत स्वागत केले.



विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी मनात भीती निर्माण होते. आपल्या मुलाला पेपर कसा जाईल याचा तणाव पालकांनाही असतो. परीक्षा केंद्रावर मुलांना घेऊन आलेल्या पालकांचे अनपेक्षित पणे स्वागत झाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. परीक्षा केंद्रावर आल्यावर थोडे दडपण वाटत होते. परंतु गुलाबराव पाटील सर यांच्या शुभेच्छा आणि परीक्षा केंद्रावरील काढलेले रांगोळी, झेंडूच्या पाकळ्यांची सजावट आणि गुलाब पुष्प देऊन केलेले स्वागत या वातावरणाने मी भारावून गेली आणि मनावरील दडपण दूर झाले असल्याची प्रतिक्रिया सुषमा कुंभलकर या पालकांनी दिली.


विशेष म्हणजे परीक्षा झाल्यावर पहिला पेपर चांगला गेला. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे व्यक्त केली.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र