परिक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थी भारावले...

कल्याण : सम्राट अशोक विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांच्यासह परीक्षा केंद्र संचालक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी, परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांचे शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ गुलाब पुष्प देत स्वागत केले.



विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी मनात भीती निर्माण होते. आपल्या मुलाला पेपर कसा जाईल याचा तणाव पालकांनाही असतो. परीक्षा केंद्रावर मुलांना घेऊन आलेल्या पालकांचे अनपेक्षित पणे स्वागत झाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. परीक्षा केंद्रावर आल्यावर थोडे दडपण वाटत होते. परंतु गुलाबराव पाटील सर यांच्या शुभेच्छा आणि परीक्षा केंद्रावरील काढलेले रांगोळी, झेंडूच्या पाकळ्यांची सजावट आणि गुलाब पुष्प देऊन केलेले स्वागत या वातावरणाने मी भारावून गेली आणि मनावरील दडपण दूर झाले असल्याची प्रतिक्रिया सुषमा कुंभलकर या पालकांनी दिली.


विशेष म्हणजे परीक्षा झाल्यावर पहिला पेपर चांगला गेला. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे व्यक्त केली.

Comments
Add Comment

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक

वांद्रे पश्चिममधील एस. व्ही. रोडवरील त्या तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून मिळणार मुक्ती

मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या

ब्रिटिशकालीन १२ वर्षांच्या पुलाचा शेवट; रेल्वे ट्रॅकवरील काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई: मुंबईतील ११२ वर्षांचा जुना आणि महत्त्वाचा ब्रिटिशकालीन रस्ता पूल, एलफिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाचा

मविआच्या दुटप्पी भूमिकेची पोलखोल करण्यासाठी भाजपचे आंदोलन

निवडणुकांच्या तोंडावर फेक नरेटिव्हचा 'मविआ' चा कट उधळून लावा – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण मुंबई: आगामी

वेध निवडणुकीचा : कलिना आणि वांद्रे पूर्व भाजपसाठी अनुकूल; २० ते २२ नगरसेवक निवडून येतील

उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास सचिन धानजी मुंबई : मुंबई उत्तर मध्य

मुंबईत राजकीय रणकंदन पेटले! विरोधकांच्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपचे 'मूक आंदोलन' करत जशास तसे प्रत्युत्तर

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार यादीतील मोठ्या गोंधळावर आक्षेप घेत, आज (दि. १) मुंबईत महाविकास