पुजाराच्या अर्धशतकामुळे रंजकता कायम

इंदूर (वृत्तसंस्था) : फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या इंदूरच्या खेळपट्टीवर गेल्या काही सामन्यांमध्ये धावा जमवण्यात अपयशी ठरलेला कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजाराने अर्धशतकीय खेळी खेळत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात १६३ धावा जमवत कांगारूंसमोर विजयासाठी ७६ धावांचे छोटे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्य छोटे असले, तरी खेळपट्टीचा अंदाज घेता तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कसोटी लागणार असल्याचे दिसते. नॅथन लायनच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यातील टीम इंडियाचा दुसरा डावही विशेष ठरला नाही.


गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची घसरगुंडी झाले. चेतेश्वर पुजारा वगळता भारताचा एकही फलंदाज मैदानात तळ ठोकू शकला नाही. पुजारा वगळता भारताचे अन्य फलंदाज लायनच्या सापळ्यात सहज अडकले. पुजाराने १४२ चेंडूंचा सामना करत ऑसींच्या गोलंदाजांना आपल्या विकेटसाठी रडवले. त्याने भारताकडून एकाकी झुंज देत ५९ धावा जमवत भारताला कसाबसा दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. श्रेयस अय्यरने २६ धावा करत त्यातल्या त्यात बरी साथ दिली. भारताच्या अन्य फलंदाजांनी मात्र निराश केले. त्यामुळे भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर सर्वबाद झाला. ऑसींच्या लायनची जादू गुरुवारीही चालली. त्याने एक दोन नव्हे, तर भारताच्या ८ फलंदाजांना माघारी धाडले. सेट झालेल्या पुजाराचाही अडथळा लायननेच दूर केला. मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.


तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाची सुरुवात १५६ धावांवर ४ बाद अशी करणाऱ्या ऑस्ट्रेलियालासाठी पहिले सत्र धोकादायक ठरले. सुरुवात चांगली करूनही त्यांना पहिल्या डावात दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताच्या रविंद्र जडेजाने ४, तर रविचंद्रन अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी ३ विकेट मिळवले.

Comments
Add Comment

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त

IPL 2026 : पदार्पणाच्या सामन्यातच कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’; पंजाबचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट

IPL 2026 : हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना