मुंबई : बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली, त्या कंपनीला मुलाने वरळी कोविड सेंटरच्या आयसीयूचा ठेका दिला. याशिवाय दहिसर आयसीयूचा ठेकाही याच कंपनीला दिला, असे म्हणत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे पिता-पुत्रावर सडकून टीका केली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करताना एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा ठेका दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ते बुधवारी (१ मार्च) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“आता नंबर कुणाचा, सुजित पाटकर की संजय राऊत? १०० कोटी रुपयांचा कोविड घोटाळा बाहेर आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले. कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार सापडले. काही आयकर विभाग, काही ईडीने, तर काही मुंबई पोलिसांनी शोधले. संजय राऊत यांचे भागिदार सुजित पाटकर यांच्या ‘लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस’ या कंपनीला महापालिकेकडून एकूण ३२ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी १४ कोटी ३ लाख २९ हजार ८३९ रुपये एका वेगळ्याच बँक खात्यात पाठवण्यात आले. या बँक खात्यातून कोणाकोणाला पैसे गेले हा तपास सुरू आहे. आयकर खाते यावर तपास करत आहे. आयकर विभाग, ईडी आणि मुंबई पोलीस यावर तपास करत आहेत. एका मेव्हुण्याच्या खात्यात लाखो रुपये पाठवले गेले. हा मेव्हुणा काही दिवसांनी कळेल. या प्रकरणी ज्यांना अटक झाली, त्यात केईम रुग्णालयाबाहेरचा चहावाला आहे. त्याच्यावर मे २०२२ मध्ये मी धाड घातली होती,” असे किरीट सोमय्यांनी सांगितले.
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा कोविड सेंटरचा ठेका देण्यात आला. आदित्य ठाकरेंनी तर पुण्यात पीएमआरडीएने बंदी घातलेल्या या कंपनीला वरळीतील आयसीयू ठेका दिला. पीएमआरडीएचे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसात तीन कोविड रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे या कंपनीवर बंदी घालण्यात आली,” असे गंभीर आरोप सोमय्यांनी केले आहेत.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…